Rahul Gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात आसाममध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांच्यावर निशाणा साधला आहे.
आसाममधील बारापेटा येथे ‘भारत जोडो न्याय यात्रे’दरम्यान, त्यांनी मुख्यमंत्री सरमा हे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नियंत्रण असल्याचा आरोप केला आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांच्या विरोधात काही बोलल्यास त्यांना पक्षातून हाकलून दिले जाईल, त्यामुळे ते त्यांच्या विरोधात काही बोलत नसल्याचा दावा देखील केला आहे.
पुढे राहुल गांधींनी दावा केला की, “भाजपच्या लोकांनी त्यांना हवे तितके खटले दाखल करावेत. आपल्याला काही फरक पडणार नाही. आपण खटल्याला घाबरत नाही. त्यांना ना भारतीय जनता पक्षाची (भाजप) भीती आहे ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस).असे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी राहुल गांधी यांनी ,”भाजप-आरएसएसचे लोक एका धर्म, जात, भाषा आणि राज्यांच्या विरोधात लढत असल्याचा आरोप केला आहे. तसेच पुढे राहुल गांधी यांनी “ते द्वेष पसरवतात पण आम्ही प्रेम पसरवतो. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह भाजपचे लोक द्वेषाने भरलेले आहेत.” असा आरोप देखील त्यांनी केला.