Rahul Gandhi – राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला ब्रेक देण्यात येणार आहे. २६ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान राहुल गांधी दिल्लीतील महत्वाच्या राजकीय बैठकांना उपस्थित राहणार आहेत. तसेच ते या कालावधीत ब्रिटन मधील विद्यापीठांमध्ये दोन विशेष व्याख्याने देण्यासाठी विदेश दौऱ्यावरही जाणार आहेत.
काँग्रेसचे सरचिटणीस प्रभारी कम्युनिकेशन्स जयराम रमेश यांनी याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी कानपूरच्या यात्रेनंतर २२ आणि २३ फेब्रुवारी हे दोन दिवस विश्रांतीचे दिवस असतील. यात्रा २४ फेब्रुवारी रोजी सकाळी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून पुन्हा सुरू होईल आणि त्यानंतर राजस्थानच्या धौलपूरमध्ये येण्यापूर्वी संभल, अलिगड, हाथरस आणि आग्रा जिल्ह्यांचा दौरा करणार आहे.
<
#WATCH | Uttar Pradesh: Congress leader Jairam Ramesh says, “…the real issue is that the PM is misleading the country in the name of ‘Amrit Kaal. We are saying that the last 10 years are of ‘Anyay Kaal’…PM says ‘Modi ki guarantee par jab Modi ki warranty khatam hoti hai toh… pic.twitter.com/Pe2Z3Y4kSw
— ANI (@ANI) February 21, 2024
चार दिवसांच्या ब्रेक नंतर भारत जोडो न्याय यात्रा पुन्हा २ मार्च रोजी दुपार २ वाजता ढोलपूर येथून पुन्हा सुरू होणार आहे. त्यानंतर ते मध्य प्रदेशातील इतर जिल्ह्यांसह मुरैना, ग्वाल्हेर, शिवपुरी, गुना, शाजापूर आणि उज्जैन या मार्गे जाणार आहेत. ५ मार्च रोजी दुपारी २ वाजता उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात राहुल गांधी पुजा करून दर्शन घेणार आहेत.