Qatar – india Realtion। आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा भारताची यशस्वी कूटनीती पाहायला मिळाली. कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या ८ माजी नौसैनिकांची अखेर सुटका करण्यात आली. परराष्ट्र मंत्रायलयाने याविषयी माहिती दिली आहे. सुरवातीला फाशी नंतर जन्मठेप आणि आता सुटका असा या प्रकरणाचा प्रवास झाला. मात्र या जगामध्ये चर्चा होतीय ती म्हणजे भारताच्या कूटनीतीची…
२६ ऑक्टोबर २०२३ रोजी कतारच्या न्यायालयाने आठ भारतीय नागरिकांना फाशीची शिक्षा सुनावली होती.त्यानंतर एकच खळबळ उडाली. मुळात या ८ भारतीयांना ऑक्टोबर २०२२ मध्येच अटक करण्यात आली होती. मात्र त्यांना दिलेल्या शिक्षेनंतर याची माहिती
सगळ्या जगाला झाली.
माजी नौसैनिक कोणत्या प्रकरणात कैद झाले ? Qatar – india Realtion।
कतारमध्ये तुरुंगात असलेल्या आठ भारतीयांनी यापूर्वी नौदलात सेवा बजावली होती. कतारच्या पाणबुडी कार्यक्रमात हेरगिरी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर आठही जणांना अटक करण्यात आली होती. हे लोक ऑक्टोबर२०२२ पासून कतारच्या तुरुंगात होते. कतारी न्यायालयानेही आठ भारतीयांना हेरगिरीसाठी दोषी ठरवले. त्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
कतारच्या निर्णयाचे भारताला मोठा धक्का बसला. नौसैनिकाची आरोपातून मुक्त करण्यासाठी ते सर्व कायदेशीर पर्यायांचा अवलंब करतील, असे मंत्रालयाने म्हटले होते. गेल्या वर्षी भारत सरकारच्या हस्तक्षेपानंतर कतार न्यायालयाने भारतीय नागरिकांची फाशीची शिक्षा कमी केली. नौसैनिकांच्या मृत्युदंडाची शिक्षा जन्मठेपेत बदलली.
मोदी-कतार अमिर यांच्या भेटीनंतर दिलासा Qatar – india Realtion।
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल-थानी यांची1 डिसेंबर रोजी दुबईत भेट झाली. यावेळी माजी नौसैनिकांची शिक्षा कमी करण्यात आली होती. पंतप्रधान मोदींनी कतारच्या अमिरसोबतच्या बैठकीत माजी अधिकाऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला.त्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रकरणाने वळण घेतले. अखेर भारताच्या कूटनीतील यश आले असून या नौसैनिकांची सुटका करण्यात आलीय.
सुटका झालेल्या ८ माजी सैनिकांची नावं Qatar – india Realtion।
कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुणाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि नाविक रागेश हे आठ माजी भारतीय नौदलाचे कर्मचारी अल्दहरा ग्लोबल वा टेक्नॉलॉजीजमध्ये कार्यरत आहेत. सल्लागार, जी सेवा आणि संरक्षण सेवा प्रदान करणारी कंपनी आहे.