राजेंद्र वाघमारे
नेवासा – आमची जमीन कुठलीही संमती नसतांना परस्पर स्वार्थासाठी स्वत:च्या नावावर करुन घेतली. तसेच चोरून घेतलेल्या मिळकतीसाठी शब्द रुपाचे भांडवल करून न्यायदैवतेसमोरही फौजदारी गुन्ह्यात मुळ मालकवरच खोटे आरोप करीत याचे भांडवल केल्यामुळे आमच्या आयुष्यातील दहा वर्षे आर्थिक, मानसिक, जो काही छळ झालेला आहे. तो आता पुरे झाला असून गावातील वाद हा गावातच मिटविण्यासाठी गावातील अनेक प्रतिष्ठित, धार्मिक, राजकिय व शासकिय अधिकाऱ्यांनी हा रितसर वाद गावातच थांबवावा म्हणून मध्यस्थिची भूमिका घेतली.
मात्र हा वाद काही केल्या मिटत नसल्यामुळे व आमचीही आता प्रशासकिय व न्यायप्रविस्ट वाद चालविण्याची मानसिकता राहिलेली नसल्यामुळे आता हा वाद ग्रामदैवत हनुमान मंदिरातच मिटावा म्हणून गळनिंब (ता.नेवासा) येथील श्रीदत्त भक्त दिगंबर भिमराज शेळके यांनी आता या विनाकारण होत असलेल्या वादाच्या छळास कंटाळून विरोधी कुटूंबापुढे आत्मसमर्पण करीत सोमवार (दि.१२) रोजीपासून सकाळी १० वाजता गावातील हनुमान मंदिरासमोर न्याय मिळेपर्यंत भजन सुुरु केले आहे.
यावेळी अधिक सविस्तर माहिती देतांना दिगंबर शेळके पुढे म्हणाले की,सुमारे पाचशे वर्षानंतर श्रीरामाला अखेर न्याय मिळाल्यामुळे ते आपल्या जन्मस्थानी विराजमान झालेले आहेत. श्रीरामालाही न्यायासाठी अनेक वेदना भोगाव्या लागलेल्या असून मी सुद्धा एक दत्तभक्त आहे. गेल्या दहा वर्षांपासून चालत आलेल्या प्रशासकिय छळास आपण वैतागलेलो असून याबाबत मी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्याकडे आमच्या कुटूंबांच्या झालेल्या फसवणुकीबाबतची कैफियत त्यांच्या समोर मांडलेली आहे.
मला दिल्लीत नव्हे तर गावातील गल्लीतच न्याय मिळावा म्हणून गावातील जेष्ठ-श्रेष्ठ व सत्याच्या बाजूने नेहमीच माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणाऱ्या अनेकांनी सांगूनही प्रतिस्पर्धी लोक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत त्यामुळे मला आता आत्मसमर्पण करुन हनुमान मंदिरात भजन करण्याचा आपण निर्णय घेत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की,दिगंबर शेळके यांना वडिलोपार्जित पाच एकर जमीन होती लहान बहिनीच्या लग्नासाठी त्यांच्या वडिलांनी एक एकर जमीन सावकारांकडून पैसै घेवून एक एकर जमीन त्यांना व्याजापोटी कसण्यास दिलेली होती.
कसण्यास दिलेली ही जमीन आमची संमती नसतांना ती परस्पर कशी काय नावावर झाली ? नावावर झाल्यानंतर आता रस्त्यासाठीही या महाशयाने खोटेनाटे कुभांड रचत आमच्या विरोधात कटकारस्थान रचत आहे. याबबाबत गावातील प्रतिष्ठित लोकांनी समोरच्या व्यक्तीला समजून सांगितलेले आहे माञ हा वाद काय मिटत नसल्यामुळे मला आता न्याय मिळेपर्यंत गावातील हनुमान मंदिरात आत्मसमर्पण करुन भजन गाण्याचा निर्णयही दिगंबर शेळके यांनी घेतलेला आहे.त्यामुळे सत्याच्या बाजूची पडताळणी करुन प्रशासकिय अधिकाऱ्यांनी या शांततेच्या मार्गाने न्याय मागणाऱ्या शेळके यांना न्याय देण्याची मागणी गळनिंब (ता.नेवासा) येथील ग्रामस्थांमधून केली जात आहे.
आमची कुठलीही पुर्वसंमती न घेता आमच्या पश्चात चोरीने फसवून जमीन खरेदी केलेली आहे तरीही आमच्यापासून त्याला त्रास असेल तर आम्ही आमची सर्व प्रॉपर्टी त्यांना द्यायला तयार आहोत.आमच्याकडे त्याच्या नादी लागायला वेळ नाही कारण वेळ,पैसा, आयुष्य आमच्यासाठी महत्वाचे आहे आमच्या आयुष्यातील दहा वर्षे आर्थिक ,मानसिक जो काही छळ झाला आहे.
तो आता पुरे झाला आहे तरी आता प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा आमची परिस्थिती या वादाने अर्थहिन झालेली आहे.आमचा प्रशासकिय छळ व ग्रामदैवताचे भांडवल करून चोरीने खरेदी केलेल्या जमिनीच्या रस्त्याच्या हक्कासाठी स्वतःच्या घरातील आईचा भाऊजईचा व पत्नीचा वापर करून सर्वे नं.११९ मुळ मालकाचा आर्थिक सामाजिक धार्मिक छळ केल्याबद्दल जाहिर निषेध आणि आता जाहिर माघार घेण्याच्या मनस्थितीत आपण असल्याचे यावेळी दिगंबर शेळके यांनी सांगितले.
जाला प्रेतरूप शरीराचा भाव। लक्षियेला ठाव श्मशानींचा | हा संत तुकाराम महाराजांचा अभंग म्हणत त्यांनी आपल्या भजन कार्यक्रम अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य आणून त्याचीही पुजा केल्यामुळे या शांततेच्या मार्गाने सुरु असलेले आंदोलन वाढणार की, मिटणार असा सवालही उपस्थित केला जात आहे.