Qatar : कतारमधील राहणाऱ्या आठ भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांना त्याठिकाणच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली असून, त्यामुळे देशात चर्चेला उधाण आले आहे. इस्रायल-हमास युद्धादरम्यान आखाती देश कतारचा हा निर्णय भारतीयांसाठी धक्कादायक ठरला आहे. पण प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की एक छोटासा आखाती देश भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांना फाशी देणार का? पण असे करणे कतारला सोपे नसणार आहे. कारण या नौसैनिकांसाठी आता भर सरकार पुढे सरसावला आहे.
भारताच्या या अधिका-यांना जितकी सहज शिक्षा झाली सुनावण्यात आली आहे तेवढ्या सहज या शिक्षेची अंमलबजावणी करणे कतारसाठी तितके सोपे नाही. कारण आता भारत सरकारकडून याविषयी प्रतिक्रिया देण्यात आली असून या शिक्षेविरोधात सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करण्यात येणार असल्याचे भारत सरकारकडून जाहीर केले आहे.
भारतासमोर कोणते पर्याय आहेत?
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांनाही अशाच प्रकारे फाशीची शिक्षा सुनावली होती, मात्र भारताने त्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली आणि फाशीला स्थगिती देण्यात आली. कतारच्या बाबतीतही भारताकडे हा पर्याय आहे. याशिवाय कतारचे अमीर तमीम बिन हमाद अल थानी यांच्या नेतृत्वाखाली 8 भारतीयांना आम्ही माफी देऊ शकतो. कारण कतारचे अमीर वर्षातून दोन वेळा फाशीची शिक्षा माफ करतात त्यामुळे भारताकडून या पर्यायाचा विचार केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यासाठी अर्ज प्रक्रिया केली जाते त्यात भारत सरकारकडून उशीर केला जाणार नसल्याचे म्हटले जात आहे.त्यासोबतच कतारमध्ये तुरुंगात असलेल्या भारतीयांना राजनैतिक सल्ला देणे सुरूच ठेवणार असल्याचेही भारताने स्पष्ट केले आहे.
कतारने यापूर्वीही फाशीची शिक्षा कमी केली
एका इंग्रजी वतर्मानपत्राच्या वृत्तानुसार, माजी राजनयिक केपी फॅबियन यांनी एका घटनेचा संदर्भ देताना सांगितले की, फिलिपिन्सच्या एका नागरिकालाही अशाच प्रकारे फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांनी कतार जनरल पेट्रोलियममध्ये काम केले. आरोप असा होता की हवाई दलातील इतर दोन आरोपी त्याला गुप्तचर माहिती देत असत जी तो फिलिपाइन्सला पाठवत असे. हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित होते. त्यामुळे या फिलिपिनो नागरिकाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, मात्र या प्रकरणात अपील करण्यात आले आणि न्यायालयाने शिक्षा कमी करून जन्मठेपेत आणली. हवाई दलातील अन्य दोन आरोपींची शिक्षाही 25 वर्षांवरून 15 वर्षे करण्यात आली. अशी शिक्षा आणि नंतर माफी देण्याची तिथल्या कायद्यांमध्ये प्रथा असल्याचे फॅबियन सांगतात. याशिवाय भारताशी राजनैतिक संबंधही विशेष आहेत. यामुळे आठ भारतीयांना फाशी देणे कतारला सोपे जाणार नाही.