नागपूर – आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बांधकामांना ‘शास्ती’माफी देण्याचा निर्णय घेत असल्याची घोषणा केली. यावर पुण्याला देखील हा निर्णय लागू होणार का ? अशी विचारणा हडपसरचे आमदार चेतन विठ्ठल तुपे यांनी विधानसभेत केली. परंतु हा निर्णय फक्त पिंपरी चिंचवडसाठी असल्याचे उपमुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टपणे सांगितले.
विरोधी पक्षनेते आदरणीय अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडप्रमाणे राज्यातील सर्व महापालिकांसाठी ‘शास्ती’माफीचा हा निर्णय लागू करावा अशी मागणी केली. आमदार चेतन तुपे आणि आमदार सुनील टिंगरे यांनीही सरकारने दूजाभाव न करता सर्व शहरांना समान निर्णय लागू करण्यात यावा अशी आग्रही भूमिका मांडली. सर्व शहरांना समान निर्णय लागू करण्यात यावा ही भूमिका विरोधी पक्षांनी विधानसभेत घेतली आहे.
उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीसजी यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बांधकामांना ‘शास्ती’माफी देण्याचा निर्णय घेत असल्याची घोषणा केली. यावर पुण्याला देखील हा निर्णय लागू होणार का? अशी विचारणा मी केली. परंतु हा निर्णय फक्त पिंपरी चिंचवडसाठी असल्याचे उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितले pic.twitter.com/D9em87rHF4
— Chetan Vitthal Tupe (@ChetanVTupe) December 21, 2022
हा निर्णय अमलात आणताना शास्ती’माफीचा निर्णय सुस्पष्ट असेल, त्यात प्रशासकीय त्रूटी राहणार नाहीत, नागरिकांना भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी अशी सूचना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
पिंपरी-चिंचवड : ‘शास्ती’माफी निर्णयासंबंधात अजित पवारांची मागणी, म्हणाले “प्रशासकीय त्रूटी …”
आमदार चेतन तुपे यांनी विधानसभेत बोलतांना माझ्या मतदारसंघातील जी गावे महानगरपालिकेत नव्यानं समाविष्ट झालेल्या गावांचा कर आकारणी करतांना सकारात्मक विचार होणं गरजेचं आहे असे मत मांडले. या गावांना चुकीची कर आकारणी होते आहे याविरोधात उंन्ड्री गावातील नागरिकांनी आंदोलनही केले होते. या गावांसाठी ‘शास्ती’माफीचा निर्णय होऊन तिथे सोयीसुविधा वेगानं उपलब्ध करुन देण्यात याव्यात अशी आग्रही मागणीही आमदार चेतन विठ्ठल तुपे यांनी केली आहे.
शिंदे – फडणवीस सरकारच्या आजच्या निर्णयाचा फायदा फक्त पिंपरी चिंचवडला झाला असून पुणेकरांचा मात्र या निर्णयामुळे कोणताही फायदा झालेला नाही. पुणेकरांचा या निर्णयामुळे भ्रमनिरास झाला आहे.