वानवडी – महापालिकेच्या कै. बापूसाहेब जलतरण तलावाचे पाणी बदलण्याखेरीज गेल्या २५ वर्षांपासून तलावाचे नुतनीकरणच झाले नसल्याने तलावाची मोठी दूरवस्था झाली आहे.
१९९५ मध्ये वानवडीत महापालिकेने ६ लाख लिटर पाणी क्षमता असलेल्या कै. बापूसाहेब केदारी जलतरण तलावाची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. परंतु, या तलावाकडे पालिकेच्या दुर्लक्षामुळे मोठी दूरवस्था झाली आहे.
नसल्यामुळे स्वच्छतागृह वापरण्यायोग्य नाही. पालिकेने गैरसोयी दूर करून चांगल्या सुविधा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
यामुळे दूरवस्था..
– पाणी फिल्टर करणारे उपकरण जुने
– फिल्टर मधून पाणी स्वच्छ होत नाही
– गळतीमुळे पाण्याचा अपव्यय
– फिल्टरच्या खोलीचे छत मोडकळीस
– पाण्यातील माती शोषून घेणारी मशीन बंद
– फ्लोरींगचे टाईल्सचे चीप निघाले
– विद्यूत वाहिन्यांच्या खोलीचे दरवाजे तुटलेले
– मीटर बाॅक्स गंजलेल्या अवस्थेत
– ड्रेनेज लाईन तुटलेल्या
याकडेही दूर्लक्ष…
विद्यूत दिवे कमी असल्याने प्रकाश नाही, स्विच बोर्ड तुटलेले आहेत , बेबी पूल बंद आहे, बाथरूमचे दरवाजे तुटलेले, शॉवर्स, ओपन शॉवर रुमच्या पाण्याचे पाइप जीर्ण व तुटले आहेत. स्वच्छतागृहातील पत्रे गंजले आहेत.