जुन्नर – शिवसेना पाठीमागून वार करत नसतो तर समोरूनच कोथळा बाहेर काढत असते, असे प्रत्युत्तर खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या “शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला’ या टीकेवर दिले.
तसेच महाआघाडी सरकारमध्ये जरी तीन पक्ष असले तरी मुख्यमंत्री हा शिवसेनेचा आहे.शिवसेनेची भूमिका नेहमीच निर्णायक ठरल्याचे राऊत यांनी नमूद केले. आळेफाटा (ता. जुन्नर) येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यात राऊत बोलत होते. यावेळी उपनेते रवींद्र मिर्लेकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आदी उपस्थित होते.
शरद पवार यांनी देशाचे नेतृत्व करावे
“उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ही मंडळी आपलीच असून, शरद पवार साहेब हेही आपलेच आहेत. त्यांनी देशाचे नेतृत्व करावे,’ अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली.