राजगुरूनगर – शहरात वाडा रस्त्यावर विजेच्या खांबांचे शिफ्टिंग करताना कंत्राटदाराच्या बेपरवाई आणि कामगारांच्या असुरक्षितेतेमुळे दोन कर्मचार्यांना विजेचा जबरदस्त धक्का बसला. यातील एकाचा मृत्यू झाला असून दुसरा कामगार गंभीर जखमी झाला आहे. शहरातील प्रांत कार्यालय ते एलआयसी ऑङ्गिसच्या दरम्यान मंगळवारी (दि. 19) दुपारी तीनच्या सुमारास शिफ्टिंग केलेल्या विजेच्या विजेच्या खाबांवर वीज वाहक तारा जोडण्यासाठी एक खांबावर सचिन रवींद्र वटी (वय 20) व स्वप्निल राधेश्याम मानकर (वय 20 रा. देवरी जि. गोंदिया) हे दुसर्या खांबावर चढले होते.
तारा जोडत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरु झाल्याने सचिन वटी यांना जोरदार विजेचा धक्का बसल्याने तेे सुमारे 30 फूट उंच खांबावरून खाली कोसळले त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर स्वप्निल मानकर वय हे गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान रात्री उशिरा यातील मृत कामगाराचा मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला त्यानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दुसर्या जखमी कामगारावर राजगुरूनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माहिती देण्यास अधिकारी असमर्थ
या दुर्दैवी घटनेप्रकरणी अधिकार्यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शवली आहे. या घटनेस जबाबदार असणारा ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
झाडांचीही कत्तल
रस्ता करताना रस्त्या लगत असलेली झाडांची कत्तल करण्यात आली यात प्रांत कार्यालयाच्या समोरच्या अनेक झाडांचा समावेश आहे. गेली कित्येक वर्षांची ही झाडे तोडल्याने पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान कामगारांच्या मृत्यू बाबत खेड पोलीस ठाण्यात कोणतीच माहिती अद्यापपर्यंत उपलब्ध झालेली नाही.