आळंदी -ग्राहक हिताय, शेतकरी सुखाय। हे ब्रीद अंगीकारून आळंदी (ता. खेड) येथे आठवडे बाजाराचा गुरुवारी (दि. 22) शुभारंभ करण्यात आला. हा बाजार दर गुरुवारी भरणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ पुरस्कृत सचिन गिलबिले फाउंडेशन आयोजित शेतकरी आठवडे बाजार शेतकरी ते थेट ग्राहक अशा या आठवडे बाजाराचा शुभारंभ पुणे-आळंदी रस्त्यावर वाय जंक्शन नवीन एसटी स्टॅंड येथे करण्यात आला आहे.
गुरुवारी सायंकाळी पाच वाजता या आठवडे बाजाराची फित कापून व नारळ चढवून आळंदी नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष वासुदेव धुंडरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आळंदी नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष सचिन गिलबिले, माजी नगरसेवक दिनेश घुले, रमेश तापकीर, युवा उद्योजक राहुल चव्हाण, पद्माकर तापकीर, अमर तापकीर, सुलतान शेख, आठवडे भाजी बाजार प्रमुख गोविंद खंदारे,
श्याम यादव, सलीम पठाण, मारुती राऊत, प्रल्हाद मोगल, बापूराव पवार, इब्राहिम शेख, गोपाल खंदारे, रामदास ढेरंगे आदींसह ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आठवडे बाजारामुळे देहू फाटा परिसर आळंदी या ठिकाणच्या ग्राहकांना या आठवडे बाजाराचा दर गुरुवारी माफक दरात भाजीपाला खरेदी करण्याचा लाभ मिळणार आहे.