नीरा -विजय शिवतारे हे शिवसेनेत असताना मोठे नेते म्हणून वावरत होते; मात्र एकेकाळी साधा कार्यकर्ता किंवा पीएला त्यांनी जी पदे दिली आज त्या पदावर त्यांना समाधान मानावे लागते आहे. हा एक प्रकारे पुरंदरच्या जनतेचा हा अपमान असल्याचे आमदार सचिन अहिर यांनी म्हटलंय. शिवतारे यांना कॅबिनेट मंत्रिपदाच्या समतुल्य महामंडळ मिळायला पाहिजे होते; पण तसे काहीच झाले नाही असही ते म्हणाले.
पुरंदर तालुक्यात शुक्रवारी (दि. 20) उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने गट आणि गण निहाय बैठका घेण्यात आल्या. नीरा येथील शासकीय विश्रामगृहात गृहात शिवसेना उपनेते आमदार अहीर व पुणे जिल्हा समन्वयक रविंद्र मिर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा संघटक मच्छिंद्र खराडे, विधानसभा संपर्क प्रमुख अनिल घोणे, पुरंदर तालुकाप्रमुख अभिजीत दादा जगताप, उपतालुका प्रमुख बाळासाहेब रणनवरे,
राजाभाऊ क्षीरसागर, राहुल यादव, अनिल झगडे, शांताराम जगदाळे, जिल्हा महिला संघटीका अरुणाताई हरपळे, जिल्हा संपर्क संघटिका सुषमा अंबरे, शिवसेना सासवड शहर प्रमुख राजेंद्र जगताप, शिव आरोग्य सेवा तालुकाप्रमुख आदिराज कोठडीया, बाळासाहेब गायकवाड, युवा सेना नीरा शहर प्रमुख सागर बागडे, नीरा उपशहर प्रमुख सिद्दीक बागवान बाप्पु खोमणे, अजय खोमणे,साहिल बागवान, रोहन मेमाणे, सुशांत ढोक, दिलीप चव्हाण यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
स्वबळाची तयारी ठेवा
बैठकीत नंतर आमदार सचिन आहीर यांनी माध्यमांशी संवाद साधला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वूमीवर आम्ही गट निहाय बैठका घेत असून पक्षाची स्थिती जाणून घेत आहोत. मागील काळात पुरंदर तालुक्यात शिवसेनेचे तीन जिल्हा परिषद सदस्य होते.पुढील निवडणुकीत कार्यकर्त्यांची स्वबळाची तयारी आहे. आघाडी होणार निर्णय सर्वांना मान्य असले तरी देखील आमची स्वबळाची तयारी असायला हवे, असे ही सचिन अहिर यांनी म्हटलंय.