नारायणगाव -भारतीय टपाल विभागातर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवर पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा 15 वर्षाखालील वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत पत्र लिहिता येणार आहे. पत्र लेखनाचा विषय कल्पना करा की तुम्ही एक सुपर हिरो आहात, आणि तुमचे ध्येय जगभरातील सर्व मार्ग मुलांसाठी अधिक सुरक्षित करणे हे आहे.
‘तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला कोणत्या महाशक्तीची आवश्यकता आहे’ हे स्पष्ट करणारे पत्र लिहायचे आहे. स्पर्धा 19 मार्च सकाळी 10.30 वाजता एस. पी. कॉलेज पोस्ट ऑफिस, विजयनगर गार्डन पुणे येथे होणार असून इच्छुकांनी 17 मार्च रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत अधीक्षक डाकघर शिवाजीनगर हेड पोस्ट ऑफिस इमारत यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पुणे ग्रामीणचे अधीक्षक बी. पी. एरंडे यांनी दिली. विजेत्यांना राज्य पातळीवर 25 हजार, 10 हजार, 5 हजार तर केंद्रीय पातळीवर 50 हजार, 25 हजार, 10 हजार व प्रमाणपत्र अशी स्वतंत्र बक्षिसे देण्यात येणार आहे.