– शिवाजी गाडे
डिंभे -एकेकाळी हरितक्रांतीचा तालुका म्हणून ओळखला जाणारा व आंबेगाव तालुक्याला वरदान असणाऱ्या डिंभे धरण सध्या पाणीसाठा 63.8 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीचा प्रश्न निर्माण झाला आहे .
त्यामुळे त्या ठिकाणच्या स्थानिकांनाच पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. मागील वर्षी आज मिती 51 टक्के इतका पाणीसाठा होता. कधीतरी नळाला पाणी येते. त्यातही हे भटकंती करणारे नागरिक पाण्यासाठी रांगा लावतात. त्याचा त्रास संबंधित नळमालकाला किंवा स्थानिकांना सहन करावा लागतो.
शासनाच्या कृपेने गावा-गावात अनेक ठिकाणी कूपनलिका नादुरुस्त आहेत. त्यामुळे पुरेसे पाणी मिळण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. एका गावात नाही म्हटले तरी दोन ते तीन कूपनलिका उपलब्ध आहेत; परंतु त्या नुसत्या नावापुरत्या आहेत. काही ठिकाणच्या कूपनलिका सुरूआहेत,
तर काही ठिकाणी ठणठण गोपाळ अशी स्थिती आहे. पाण्याच्या नियोजनासाठी लोकांनी सहभागातून पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यातूनच काही प्रमाणात पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल, याचा गांभीर्याने विचार सरकारने आणि सामान्यांनी करणे गरजेचे आहे.
त्यातूनच समस्या सोडविण्यास मदत मिळेल. यंदाच्या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यामध्येच कुकडी पाटबंधारे तसेच शासनाच्या निर्णयाने कालवा अस्तरीकरणाचे काम सुरू असल्या कारणाने मागील वर्षाच्या तुलनेत पाण्याचे आवर्तन सोडता आली नाही. यामुळे धरण क्षेत्रात या वर्षी जादा पाणीसाठा असून सध्या जाणवत असलेल्या उन्हाच्या तीव्रतेने पाणीटंचाई जाणवू
लागली आहे.
कोणी पाणी देता का पाणी?
आंबेगाव तालुक्याच्या काही भागात पाण्याची पायपीट सुरू आहे. या टंचाईवर सामान्य नागरिक आपापल्या परीने तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहे. कोणी पाणी देता का पाणी? अशी म्हणण्याची वेळ आली आहे. पाणीटंचाईमुळे हाताशी आलेली पिके जळू लागली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
दुष्काळी भागात नागरिकांची परवड
धरणक्षेत्रात अशी भयानक स्थिती आहे, तर दुष्काळ असणाऱ्या भागामध्ये सध्या नागरिकांची परवड होताना दिसत आहे. या परवडीवर शासनाने लवकरचा तोडगा काढणे गरजचे आहे. तसेच जे भटकंती करणाऱ्या समाजालाही याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. अजून दोन महिन्यांनंतर विविध ठिकाणी भयानक चित्र आहे. या वर्षी धरण लाभक्षेत्रातदेखील टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.
धरणांची पाण्याची पातळी आटू लागली आहे. पाणीटंचाईमुळे हाताशी आलेली पिके जळू लागली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. धरणक्षेत्रात अशी भयानक स्थिती आहे, तर दुष्काळ असणाऱ्या भागामध्ये सध्या नागरिकांची परवड होताना दिसत आहे. या परवडीवर शासनाने लवकरचा तोडगा काढणे गरजचे आहे.