वाल्हे- परतीचा मुसळधार पावसामुळे फूल शेतीला मोठा फटका बसला होता. त्यामुळे उत्पादन घटल्याने दसऱ्याला झेंडूने थेट किलोला 200 ते 300 रुपये दर मिळाला होता. मात्र, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने उत्पादकांनी फूल शेतीवर अधिक लक्ष दिल्याने ऐन दिवाळीत मुबलकप्रमाणात फुले उपलब्ध झाली असून किलोला 120 ते 150 रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना हा दर सुखावणार आहे. तर पाडव्याला यात आणखी वाढ होण्याची आशा बळीराजाला आहे.
पुरंदर तालुक्यातील दौंडज खिंड, तरसदरा, वाल्हे या परिसरामधील शेतकरी दरवर्षी मोठ्याप्रमाणात झेंडूची फूल शेती करतात. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून दिवाळीसाठी झेंडूची तोडणी जोमाने सुरू आहे.
पिवळा, गुलाबी अशा विविधरंगी झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असल्याचे फूल उत्पादक शेतकरी
आबासाहेब जगताप, संतोष शेटे, विजय जगताप, रामदास भोसले, अविनाश कदम यांनी सांगितले.