नारायणगावात चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात
नारायणगाव – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत उद्धव ठाकरे यांनी खंजीर खुपसला म्हणून ते मुख्यमंत्री होऊ शिकले नाही; परंतु ठाकरे यांना आता कोणी विचारत नाही, अशी घणाघात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
“शिरूर लोकसभा प्रवास’ योजनांतर्गत महाविजय 2024 अंतर्गत “घर चलो’ अभियान कार्यक्रमातर्गंत बावनकुळे गुरुवारी (दि. 12) नारायणगाव येथे आले होते, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, आमदार राहुल कुल, माजीमंत्री बाळा भेगडे, सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे, धर्मेंद्र खाणंरे, जयश्री पलांडे, ताराचंद कराळे, आशा बुचके, संतोष खैरे, आशिष माळवदकर, ऍड. राजेंद्र कोल्हे, शरद दरेकर,अक्षय खैर, अक्षय डोके, अमित औटी, माया डोंगरे, सविता गायकवाड, संगीता वाघ, पंडित मेमाणे, दिलीप गांजाळे, अमोल भुजबळ उपस्थित होते.
चंद्रशेखर बावनकुळे यांचे नारायणगाव नगरीत जोरदार स्वागत करण्यात आले. आदिवासी महिलांचे लेझीम पथक, पारंपरिक वाद्य, आदिवासी तरुण पारंपरिक पेहराव करून मिरवणुकीत सहभागी झाले होते. विश्वकर्मा योजना केंद्राने राबविल्याबद्दल 12 बलुतेदार व्यवसायिकांनी आपल्या व्यवसायाचे प्रदर्शन मांडले होते. मोदी सरकारने योजना राबविल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
बस स्थानक चौकातील स्व.विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर याच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बावनकुळे पायी चालत नागरिक व दुकानदारांशी संवाद साधला. मोदी यांच्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीबद्दल जनतेला काय वाटते. याबाबत त्यांचे मत जाणून घेत असताना मोदींच्या कामावर खुश असल्याचे लोकांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष माळवदकर यांनी तर शरद दरेकर यांनी आभार मानले.
शरद पवार, आपला पक्ष कोठे उरलाय का?
गेल्या नऊ वर्षांत देशाचे नेतृत्व कणखरपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून 2024 ला देशाचे पंतप्रधान मोदीच पाहिजेत असा सगळ्यांचा सूर आहे. अजित पवार यांनी जगाचे नेतृत्व करण्याची धमक नरेंद्र मोदी यांच्यात असल्याचे कबूल करतात. शरद पवार आपला पक्ष कोठे उरलाय का? हे शोधत फिरत आहेत, अशी खरमरीत टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांवर केली.