लोकअदालतमध्ये प्रलंबित 286 तर दाखलपूर्व 14470 प्रकरणे मिटवली
राजगुरूनगर – येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी (दि. 10) झालेल्या लोकअदालतमध्ये प्रलंबित 286 दावे तडजोडीने मिटवण्यात आले तर 3 कोटी 34 लाख 20 हजार 58 रुपयांची वसुली झाली. दाखलपूर्व 14,470 प्रकरणे मिटवण्यात आली असून त्यापोटी 9 कोटी 65 लाख 3 हजार 277 रुपयांची वसुली झाली. दरम्यान, दोन्ही मिळून 12 कोटी 99 लाख 23 हजार 335 रुपयांची वसुली करण्यात आली.
राजगुरूनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी (दि.10) राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. सय्यद यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. पोळ, कनिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश एस. बी. नाईकनवरे, जे. बी. म्हस्के, एस. जी. पवार, खेड बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. संजय गोपाळे, उपाध्यक्ष ऍड. बिबिषण पडवळ, ऍड. पवन कड, ऍड. वैशाली मुंगसे, ऍड. प्रमोद वाडेकर,
ऍड. अपेक्षा धुमाळ, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. पोपटराव तांबे, ऍड. बी एम सांडभोर, ऍड. नवनाथ गावडे, ऍड. सुभाष कड, ऍड. देविदास शिंदे, ऍड. प्रदीप उमाप, ऍड. संतोष दाते, ऍड. संदीप घुले, ऍड. दीपक चौधरी, ऍड. संजय साकोरे, ऍड. अनिल वाडेकर, ऍड. माणिक गारगोटे यांच्यासह कार्यकारणी सदस्य, वकील बारचे सदस्य, तालुक्यातील ग्रामपंचायती, विविध बॅंकांचे अधिकारी, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उदघाटनानंतर येथील जिल्हा न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी वकील, पक्षकार यांना मार्गदर्शन केले. पॅनल सदस्य म्हणून ऍड. समीर गोडसे, ऍड.आनंद ठक्कर, ऍड. कावेरी गुंजाळ, ऍड. सारिका उमाप यांनी काम पाहिले. विधी सेवा समितीचे परमेश्वर बनसोडे, प्रतीक वडगावकर, कोर्ट कर्मचारी जे. एस. काइटे, डी. व्ही. बारभाई, पी. एच. बडगर, आर. पी. चव्हाण, एस. जी. चव्हाण, आर. एफ. गाजेखान, व्ही. पी. गोरवे, एम. पी. पाटील, एस. यू. नाळे, आर. डी. क्षीरसागर,
पी. आर. रावळ, बी. पाटील, एस. एस. शिरोडे, एस. डी. जाधव, व्ही. आर. दौंडकर, एस. डी. चव्हाण, ए. डी. गिलबिले, ए. एस. मोरे, टी. ए. घोलप, एल. डी. गुरव यांनी न्यायालयाचे कामकाज पहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. संजय गोपाळे यांनी सूत्रसंचालन ऍड. वैशाली मुंगसे, ऍड. प्रमोद वाडेकर यांनी तर ऍड. अपेक्षा धुमाळ यांनी आभार मानले.
162 ग्रामपंचायतींची पाणीपट्टी वसुली
खेड तालुक्यातील 162 ग्रामपंचायतीमधील 79,710 पाणीपट्टी थकीत कर खातेदारांपैकी लोकअदालतमध्ये 14 हजार 470 खातेदारांना नोटीस देण्यात आली होती. त्यापैकी सर्वच 14 हजार 470 खातेदारांनी तडजोड केली. तडजोडीपोटी 9 कोटी 38 लाख 18 हजार 477 रुपये वसुली झाली.यावेळीची लोक अदालत मधील ही सर्वाधिक ग्रामपंचायत पाणीपट्टी कर वसुली आहे.