बेलसर – पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील बौद्ध कुटुंब असलेले दिगंबर धाकू कदम यांची पत्नी सुमन दिगंबर कदम (वय 65 रा.बेलसर) यांचे शनिवार (दि.2) पहाटे निधन झाले. या कुटुंबात पाच मुली आहेत.
त्यांना मुलगा नसल्याने सर्व पाच मुलींनी निर्णय घेतला की, आईचा अंत्यविधी हा मुलींनीच करायचा. समाजात मुलगा कुटुंबाचा वारसा असतो पण या मुलींनी समाजापुढे वेगळी दिशा देऊन आईच्या प्रेताला पाच मुलींनी खांदा दिला आणि अग्नी देऊन अंत्यविधी संपन्न केला.
सुमन कदम यांची मोठी मुलगी मीना प्रदीप गायकवाड या पिसुर्डी (ता.पुरंदर) गावच्या असल्याने भारतीय बौद्ध महासभेचे पुणे जिल्हा प्रसार सचिव दादासाहेब गायकवाड यांच्या वहिनी आहेत
व त्या बौद्ध धम्माचा प्रचार करतात समाजाला अंधश्रद्धा व समाजाच्या रूढीपरंपरेला वेगळे दिशा देण्यासाठी मुली मीना प्रदीप गायकवाड, सीमा पांडुरंग तावरे, हेमा जयवंत जगताप, रेखा अतुल जगताप व रुपाली सचिन शेकडे यांनी हा निर्णय घेऊन स्वतःच्या आईचा अंत्यविधी केला.