चाकण : आयोध्ये येथे सोमवारी (दि. 22) होणार्या श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी खेड तालुक्यातील आळंदी येथील शिवाजी महाराज नवल यांना निमंत्रण आलेल असून ते आयोध्याला रवाना झालेले आहेत.
शिवाजी महाराज नवल हे भारतीय संस्कृतीच्या आणि वारकरी सांप्रदायिक शिक्षणाच्या माध्यमातून समाजामध्ये खूप मोठे योगदान आहे. पूर्ण वेळ देऊन समाजामध्ये धर्म जागरण म्हणून काम केलेला आहे आणि ते स्वतः श्रीमद्भगद्गीतेचे क्लास घेतात. अनेक विद्यार्थ्यांकडून त्यांनी श्रीमद्भगद्गीता मुखवर्गत करून घेतलेले आहे.
नवल हे मूळचे जिल्हा अहमदनगर शेवगाव येथील असणारे शिवाजी महाराज नवल आळंदी येथे स्थायिक झाल्यापासून ते महाराष्ट्र प्रांताचे संस्कृती प्रमुख म्हणून कामकाज पाहत आहेत आणि खूप मोठ्या योगदानामुळे त्यांना अयोध्या येथे श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण आलेले आहे.