खासदार सुळे यांची शासनाकडे मागणी
बारामती – बारामती लोकसभा मतदार संघातील सर्वच तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. तातडीने पाण्यासंदर्भात दुष्काळी आढावा बैठक घेण्याची आवश्यकता आहे. तातडीने बैठकी घेऊन पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
खासदार सुळे यांनी ट्विट करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. आढावा बैठकीत पिण्याचे तसेच शेती आणि जनावरांच्या पाण्यासाठीचे नियोजन आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत लक्ष देऊन उपमुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करावे, असे त्यांनी नमूद केले आहे.