मंचर – जून २०२० साली झालेल्या चक्रीवादळामुळे बाळ हिरड्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मंचर तालुका आंबेगाव येथील प्रांत कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाची व्याप्ती वाढत आहे. या आंदोलनास सीटू कामगार संघटनेचे राष्ट्रीय नेते कॉ. डी. एल. कराड यांनी शनिवार, दि. १७ रोजी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. तसेच विविध गावच्या सरपंच उपसरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी उपोषणाला पाठिंबा देऊन विविध गावात आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला.
किसान सभेचे प्रतिनिधी डॉक्टर अमोल वाघमारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंचर प्रांत कार्यालयासमोर गुरुवार, दि. १५ पासून हिरडा पिकाचे पंचनामे झालेले आहेत. त्याची भरपाई मिळावी,यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आंबेगाव जुन्नर तालुक्यातील चिखली गावचे सरपंच जयराम जोशी, राजपूर गावचे सरपंच चंद्रकांत लोहकरे, गोहे बु. गावचे सरपंच महादेव भवारी, तिरपाड, डोन, न्हावेड, नानवडे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच सोमा दाते, बोरघर ग्राम पंचायतचे उपसरपंच राजू घोडे, सदस्या प्रतीक्षा बांबळे,
आघाने पिंपरगणे गावचे माजी सरपंच चिंतामण वडेकर, तेरुंगण- कोंढवळ-निगडाळे ग्रुप ग्राम पंचायतचे माजी सरपंच दीपक चिमटे, जुन्नर तालुक्यातील चावंड माणकेश्वर ग्राम पंचायतचे सरपंच सुमन लांडे, जांभोरीचे माजी उपसपंच विलास केंगले, विभागीय वनहक्क समितीचे सदस्य किरण लोहकरे, होण्या बाबु केंगले प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते हेमंत केंगले व प्रा. अक्षय साळवे तसेच हडसर ग्राम पंचायतच्या लोकनियुक्त सरपंच नीता कारभळ, उपसरपंच गंगाराम सांगडे, तळेरान गावचे सरपंच गोविंद साबळे,
खुबी गावचे सरपंच शकाठे, सांगनोरे गावचे लोकनियुक्त सरपंच गणेश मराडे तसेच माजी पंचायत समिती सदस्य सुभाष तळपे, विकास भाईक, शिरूर तालुक्यातील कार्यकर्ते संतोष कांबळे,संतोष सूर्यवंशी आदींनी उपस्थित राहून आंदोलनात जाहीर पाठिंबा दिला.
तसेच हे आंदोलन चिवटपणे सुरू ठेवण्याची जबाबदारी घेत दररोज आपापल्या गावातून लोकांना आंदोलनात उतरविण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जर सरकारने या प्रश्नावर निर्णय घेतला नाही तर येत्या निवडणुकीत प्रस्थापितांना निवडणुकीत धूळ चारल्याशिवर राहणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.