भिवरेवाडीतील घटना : चौघांवर गुन्हा दाखल
आळंदी – शेत जमिनीचे नुकसान करत असताना जाब विचारला म्हणून मारहाण करत शेतकऱ्यावर जीवघेणे वार केले आहेत. ही घटना बुधवारी (दि. 18) चाकण येथील भिवरेवाडी परिसरात घडली आहे.
शिवाजी बजाबा काळे, विजय शिवाजी काळे, तानाजी पोपट कोळेकर व महिला आरोपी (सर्व रा. चाकण) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर चांगदेव बिवाजी काळे (वय 33 रा.चाकण) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी शेतात काम करत असताना शिवाजी हा टेम्पो घेऊन शेतात आला व त्याने शेतीचे नुकसान केले. याचा जाब विचारला असता त्याने शोजारच्या शेतातून इतर आरोपींना बोलावले.
फिर्यादीला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच कुऱ्हाडीने वार करत जिवघेणा वार केला.