रांजणगाव गणपती – जातीनिहाय जनगणना बिहारने केली. मात्र, महाराष्ट्र का करीत नाही, असा सवाल जनता दल सेक्युलरचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी केला आहे.
शेवाळे म्हणाले की, ७ ऑगस्ट १९९० रोजी देशातील ओबीसी प्रवर्गातील नोकऱ्या आणि शिक्षणात २७ टक्के आरक्षण जनता दलाचे माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग सरकारने दिले. भाजपाच्या पाठिंबावर किमान समान कायद्या अंतर्गत हे सरकार बनले होते. निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात आम्ही सत्तेत आलो तर मंडल आयोगाची अंमलबजावणी करू, असे आश्वासन जनता दलाने जनतेला दिले होते.
निवडणुकीनंतर जनता दलाचे सरकार सत्तेत आले. माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग, शरद यादव यांनी आपला शब्द पाळत आरक्षण जाहीर केले. भाजपाने आमच्या सरकारचा पाठिंबा काढून घेत सरकार पाडले. त्यामुळे सरकारला राजीनामा द्यावा लागला. आता देशात मंडळ दोनने धुमाकूळ घातला आहे. यावर जातीनिहाय जनगणना हा एकच पर्याय आहे. १९९६ साली माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वात पुन्हा जनता दलाचे सरकार सत्तेत आले.
काँग्रेसने या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. सरकारने जातीनिहाय जनगणनेच्या ठराव सहमताने परहित केला. मात्र पुन्हा एच.डी. देवेगौडा सरकारचा पाठिंबा काँग्रेसने काढून घेतला तेही सरकार पडले. आरक्षणासाठी सर्व जाती समुदाय लढा देत आहेत. यावेळी बिहारमध्ये जनगणना केली. जे बिहारने केले तेच महाराष्ट्रत सरकारने का करीत नाही, असा थेट सवाल शेवाळे यांनी शिंदे, फडणवीस, पवार, सरकारला केला आहे.
गेली एक दीड वर्षापासून या न त्या कारणाने राज्यात अस्तिराचे वातावरण सुरू आहे. निवडून आलेले आमदार आयपीएल प्रमाणे खेळत आहेत. शिवसेना अडचणीत आल्यानंतर फडणवीस यांनी राष्ट्रवादीत फूट पाडली. आरक्षणाची लढाई सुरू केली, राज्यात कधी हिंदू-मुस्लिम तर कधी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटून कारभार केला जात आहे. खरं म्हणजे आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे हजारो वर्ष अन्याय, अत्याचार सहन केलेल्या समाजाला सन्मानाने जगता येण्यासाठी संविधानात ३४० कलमाने आरक्षणाची तरतूद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती.
ओबीसींना विरोध करणारे लाभार्थी
ओबीसी आरक्षणासाठी जनता दल सेक्युलरची दोन सरकारांना राजीनामा देण्याची वेळ आली आहे. आता जनता दल सेक्युलर नव्याने ओबीसी आरक्षणाची लढाई लढणार आहे, हे आरक्षण जनता दल सेक्युलर सरकारने लागू केले. पण फायदा मात्र, ज्यांनी विरोध केला ते घेत आहेत. लवकरच जनता दल राज्यभर ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू करणार असल्याचे जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष शेवाळे यांनी सांगितले.