सोमेश्वरनगर (ता. बारामती) : आमदार संजय जगताप यांनी सोमेश्वर कारखान्यावर जात ऊसतोडणीची मागणी केली.
नीरा – पुरंदर तालुक्यात सध्या सर्वत्र दुष्काळ पडला आहे. शेतीसाठीच पाणी आता पूर्ण आटत आले आहे. त्यामुळे उसाचे उभे पीक जळून चाललं आहे. यामुळे शेतकर्यांचं मोठ नुकसान होतं आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याने कोणताही निकषन लावता सरसकट ऊस तोडून न्यावा, अशी मागणी आमदार संजय जगताप यांनी केली आहे.
आमदार संजय जगताप यांनी पुरंदर तालुक्यातील शेतकर्यांच्या शिष्टमंडळासह सोमेश्वरच्या संचालक मंडळाची व अध्यक्षांची बुधवारी (दि. 27) भेट घेतली आहे. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी आदर्श सदस्य सुदाम इंगळे व अनेक शेतकरी या शिष्टमंडळामध्ये सहभागी झाले होते. संचालक मंडळाची मीटिंग सुरू असताना आमदार संजय जगताप, सुदाम इंगळे आणि शेतकर्यांनी आपली बाजू संचालक मंडळसमोर मांडली.
बागायती भागातील ऊस थोडा उशिरा नेला तरी चालेल; मात्र जिराईत भाग किंवा ज्या भागात दुष्काळ आहे अशा ठिकाणी तातडीने ऊस नेण्यासाठी टोळ्या वाढवा अशी मागणी यावेळी करण्यात आली. सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले की, यावर्षी सुद्धा आपण ज्या भागात दुष्काळी परिस्थिती आहे, त्या भागातला ऊस लवकर आणण्यासाठी प्राधान्य देत आहोत. त्यासाठी आपल्याला बागायत पट्ट्यातील शेतकर्यांचे देखील सहकार्य अपेक्षित आहे. ज्या लोकांचा उशिराने तोडला जाणार आहे अशा लोकांना कारखान्याच्या वतीने सानुग्रह अनुदान (वाढीव भाव) देखील दिलाजाणार आहे. त्यामुळे लोकांनी जास्त घाई करू नये असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
“पुरंदर तालुक्यातून आता दिवसाला 1200 टन ऊस दररोज आणला जातो. त्यामध्ये 500 टन वाढ करून लवकरात लवकर पुरंदर तालुक्यातला त्याचबरोबर बारामती तालुक्यातील दुष्काळी भागातील ऊस गाळला जाईल यासाठी आपण प्रयत्नशील आहे.” – पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्वर सकारी साखर कारखाना