बारामतीत परिसंवादमध्ये 342 शेतकरी सहभागी
बारामती – ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, संचलित, कृषी विज्ञान केंद्र, बारामती, आत्मा पुणे, कृषी विभाग महाराष्ट्र शासन, अटल इन्क़ुबेशन सेंटर, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर, महाराष्ट्र राज्य डाळिंब उत्पादक संघ, बारामती तालुका फलोत्पादन संघ आणि माण देशी फौउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विषमुक्त निर्यातक्षम डाळिंब उत्पादन परिसंवादात सातारा, सोलापूर, पुणे, नगर, सांगली जिल्ह्यातील सुमारे 342 डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
यावेळी ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी कोणतेही फळबाग लागवड करत असताना रोपांचे उत्तम वाणाची निवड करून जमिनीच्या आरोग्यावर लक्ष देऊन जमिनीमध्ये असणारे सूक्ष्म जीव सेंद्रिय कर्ब आणि त्याच बरोबर संपूर्ण विषमुक्त उत्पादनावर भर दिला. याबरोबर शेतकऱ्यांनी झाडांना पिकांना पाणी देताना आपल्या थमरोल न देता ते शास्त्रीयदृष्ट्या कसे देता येईल या विषयी सविस्तर मत व्यक्त केले.
खउचे संचालक डॉ. सुब्रतो रॉय यांनी शासनाच्या योजनाचा लाभ घेताना केव्हीकेने आयोजित केलेल्या डाळिंबासारख्या कार्यशाळेमध्ये सर्व भागातील शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे. शास्त्रयुक्त तंत्रज्ञानाची माहिती घेतली पाहिजे. भविष्यामध्ये शेती करता असताना मनुष्यबलाचा कमी वापर आणि यांत्रिकीकरण डॉर्नसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. सोमनाथ पोखरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर यांनी डाळिंब पिकातील प्रभावी सुत्रकृमी (निमॅटोड) व्यवस्थापनविषयी मार्गदर्शन केले.
डॉ. ज्योत्सना शर्मा, प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर यांनी डाळिंबामधील तेल्या, मर रोग आणि खोड किडा व्यवस्थापणविषयी आणि भविष्य येणाऱ्या अडचणी या विषयी मार्गदर्शन केले. डॉ. हरिहर कौसडीकर, संशोधन संचालक महाराष्ट्र शिक्षण आणि संशोधन परिषद, पुणे यांनी बदलत्या हवामानात डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन तंत्रज्ञानाविषयी मार्गद्शन केले.