राहू : तीन तालुक्यांसाठी वरदान असलेल्या भामा – आसखेड धरणातून 1200 क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी यासाठी कालवा समितीच्या बैठकीमध्ये या संदर्भात मोठा पाठपुरावा केला होता.
त्याला यश येऊन पाणी सोडण्यात आहे. याचा फायदा भीमा भामा नदीवर असलेल्या साधारणपणे अठरा बंधार्यांना होणार आहे. साधारणपणे आलेगाव पागापर्यंत हे पाणी येणार असून, उन्हाळ्याच्या दिवसांत शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वाढत्या तापमानामुळे पाण्याची गरज वाढली आहे. त्या मुळे पिके सुकू लागली आहेत. दौंड तालुक्यातील व शिरूर तालुक्यासाठी पाटेठाण, निमगाव म्हाळुंगी, पाणवलितील छोटा बंधारा,
वडगाव बांडे, आलेगाव पागा या बंधार्याना या पाण्याचा फायदा होऊन आसपासच्या अनेक गावांना याचा फायदा होणार आहे.