पुणे -प्रतिकूल परिस्थती आणि आर्थिक स्थिती नसल्याने दिवसा काम करून सायंकाळी रात्रशाळेत जाऊन शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तम कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे कचरावेचकांच्या मुला-मुलींनी चांगले गुण मिळवत, आपल्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा केला आहे.
चिंचवडमधील आनंदनगर वस्तीतील प्रज्वला ओहोळ हिने वाणिज्य शाखेत 77 टक्के गुण मिळवले आहेत. त्याचप्रमाणे चाकण वस्तीतील दिशा बचुतेने वाणिज्य शाखेत 75.77 टक्के गुण मिळवत उत्तम यश संपादन केले आहे. हडपसरमधील सोनाली भेंडे हिने अतिशय प्रतिकूल परिस्थितून यश मिळवत 40 टक्के गुण मिळवले आहे. सोनाली पाचवीत असतांना तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर तिची आई रत्नामा यांनी सोनालीचे पालनपोषण केले. पाचवीत असताना माझ्या वडिलांना मी गमावले आणि माझी आईच माझ्या पाठीमागे खडकाप्रमाणे उभी राहिली, मला सतत अभ्यास करण्यास आणि मोठी स्वप्ने पाहण्यास प्रेरित करत होती, असे सोनालीने सांगितले.
वारजे वस्तीतील बालाजी शिंदे याने कला शाखेत 69.33 टक्के गुण मिळवले. हडपसर परिसरातील हिने वाणिज्य शाखेत 68 टक्के मिळवत यशाला गवसणी घालती आहे. धानोरी परिसरातील कोमल (67.5) आणि समाधान (65.33) म्हेत्रे या चुलत बहिणी एकाच वेळी वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण झाल्या आहेत, अशी माहिती कागद, काच, पत्रा, कष्टकरी,पंचायतीच्या वतीने आदित्य याने सांगितले.
पार्थला जन्मापासूनच सिरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रासलेले असल्याने पार्थ स्वतःच्या पायावर आधाराशिवाय उभा राहु किंवा चालु शकत नव्हता. पहिल्या इयत्तेपासून पार्थ अभ्यास आणि इतर ऍक्टीव्हीटी मध्येही कायमच पुढे राहीला.
पार्थला 86.5 टक्के मिळाले. खूप आनंद झाला अशी भावना पार्थची आई कुलश्री भोसले यांनी व्यक्त केली. 82% अपंगत्व असलेला पार्थने अपंगांमधून बीएमसीसी कॉलेजमध्ये पहिला आला.