पुणे – यंदाच्या उन्हाळ्यात विमानप्रवास तब्बल ६० टक्क्यांनी महागला आहे. त्यामुळे प्रवाशांना विमानांचे तिकीट दर पाहून एकूणच घाम फुटणार आहे. विमानांची संख्या कमी आणि मागणी जास्त असल्याचा हा परिणाम आहे. याचा सर्वाधिक फटका देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांना बसणार आहे. पुण्याहून सिंगापूरपेक्षा श्रीनगरला जाणे महागात पडते आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत प्रवाशांना दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत.
श्रीनगर, लेह, लडाख, पोर्ट ब्लेअर, अंदमान आदींसारख्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे, मात्र त्या तुलनेत विमानांची संख्या कमी आहे. शिवाय मागच्या वर्षीच्या तुलनेत देशातील काही प्रमाणात विमानांचे मार्गदेखील कमी झाले आहेत, तसेच अन्य पर्यटन स्थळीदेखील जाणाऱ्या प्रवाशांचा ओढा जास्त आहे. त्यामुळे विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांनी तिकीट दरात मोठी वाढ केली आहे. सामान्य दराच्या तुलनेत सुमारे ५५ ते ६० टक्के दरवाढ केली आहे.
असे आहेत दर…
पुणे ते सिंगापूर : १९ हजार ५००
पुणे ते श्रीनगर : २५ ते ३० हजार
(हे दर प्रति व्यक्तीचे परतीच्या प्रवासासासह (राऊंडेड) तिकिटाचे आहेत.)
पुणे ते अयोध्या : ९ ते १० हजार
पुणे ते दिल्ली : ६ हजार
वाराणसी : १० हजार
जयपूर : ६०००
(हे दर प्रतिव्यक्ती एकेरी मार्गाचे आहेत)