नगर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह निवासस्थानावर मंगळवारी (दि.7) रोजी अज्ञात समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्याचा समस्त आंबेडकरी समाजच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. तर या प्रवृत्तीचा शोध घेऊन हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालया समोर या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक अजय साळवे, सुनील क्षेत्रे, सुमेध गायकवाड, शंकर नगरे, नितीन कसबेकर, विशाल गायकवाड, किरण गायकवाड, अवि शिंदे, अमित काळे, विनोद साळवे आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर हल्ला होणे अत्यंत निषेधार्ह आहे. या हल्लेखोरांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी. या पवित्र स्थळाची विटंबना करू पाहणाऱ्या प्रवृत्तीला लवकर जेरबंद करण्यासाठी पाऊले उचलण्याची गरज आहे.