नगर -जलसंपदा विभागा अंतर्गत जिल्ह्यातील सिंचन व्यवस्थापनाचे कार्यालय लाभक्षेत्र विकास प्राधिकरण या कार्यालयाच्या नियंत्रणाखाली वर्ग करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ धूत यांनी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे केली आहे.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद अंतर्गत नगर मुख्यालयात लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालय कार्यान्वित आहे, परंतु नगर जिल्ह्यातील पाटबंधारे विभाग, मुळा पाटबंधारे विभाग या सिंचन व्यवस्थापन यांच्या विभागीय कार्यालयाचे प्रशासकीय नियंत्रण नगर येथील प्राधिकरण कार्यालयऐवजी नाशिक येथील विकास
प्राधिकरणाकडे आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील लाभधारक शेतकरी, लोकप्रतिनिधी तसेच वरील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामांसाठी नाशिक येथे जावे लागत आहे. तसेच कार्यालयातील अधिकाऱ्यांना ही कार्यालयीन कामकाजासाठी आयोजित बैठकीत करिता वारंवार नाशिक येथे जावे लागत असल्याने अत्यंत गैरसोयीचे व आर्थिक खर्चाची आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील लाभधारक शेतकरी व सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामासाठी संपर्क करणे सुलभ होण्यासाठी दोन विभागाचे प्रशासकीय नियंत्रण नाशिक ऐवजी अहमदनगर मुख्यालयातील लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाअंर्तगत वर्ग करावे असे, निवेदनात म्हटले आहे. याबाबत निवेदन पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे याना दिले आहे.