नगर – अहमदनगर कामगार संघटना, संयुक्त कृती समितीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी ऍड.सुभाष लांडे, महेबुब सय्यद, शंकरराव न्यालपेल्ली, भारती न्यालपेल्ली, बापू चंदनशिवे, महादेव पालवे, सुधीर टोकेकर, अंबादास दौंड, तुषार सोनवणे, दीपक शिरसाठ, चंद्रकांत माळी, सुनिल ठाकरे, सतीश भुस, सुभाष कांबळे, सतीश निमसे, अमोल पळसकर, रावसाहेब कर्पे, महादेव कोलते, महेश पवार, भैरवनाथ वाकळे आदी उपस्थित होते.
केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी चुकीच्या धोरणामुळे सरकारी व कंत्राटी कर्मचारी संकटात आले आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी कामगार कायदे स्थगित करण्याची निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांच्याकडे केली.