नवी दिल्ली – युरोपियन युनियनचे २८ खासदारांचे शिष्टमंडळ आज भारत दौऱ्यावर असून ३७० कलम हटविल्यानंतर तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते जम्मू-काश्मीरमध्ये गेले आहेत. या दौऱ्यावरून आता विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारचा अनोखा राष्ट्रवाद असल्याची टीका केली आहे.
प्रियांका गांधी म्हणाल्या कि, युरोपियन खासदारांना काश्मीरमध्ये जाण्याची आणि हस्तक्षेप करण्याची परवानगी आहे. परंतु, भारतीय खासदार आणि नेत्यांना विमानतळावरूनच माघारी पाठविले जाते. हा मोठा अनोखा राष्ट्रवाद आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.
कश्मीर में यूरोपियन सांसदों को सैर-सपाटा और हस्तक्षेप की इजाजत लेकिन भारतीय सांसदों और नेताओं को पहुँचते ही हवाई अड्डे से वापस भेजा गया!
बड़ा अनोखा राष्ट्रवाद है यह।https://t.co/hAHVigzGFU
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 29, 2019
याआधीही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी युरोपियन खासदारांच्या काश्मीर दौऱ्यावर आक्षेप घेत टीका केली होती. ते म्हणाले कि, ‘जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर युरोपियन खासदारांचे स्वागत केले जात आहे. परंतु, काश्मीरमध्ये प्रवेशासाठी भारतीय खासदारांवर बंदी आहे. या सर्व घटनांमध्ये काहीतरी खूपच चुकीचे आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
MPs from Europe are welcome to go on a guided tour of Jammu & #Kashmir while Indian MPs are banned & denied entry.
There is something very wrong with that.https://t.co/rz0jffrMhJ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 28, 2019
दरम्यान, प्रियांका गांधी, राहुल गांधी यांच्यासह एमआयएम असदुद्दीन ओवैसी आणि बसपा प्रमुख मायावती यांनीही मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.