Priyanka Gandhi : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे द्रमुकच्या महिला हक्क परिषदेला संबोधित करताना महिला आरक्षण विधेयकाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली. यासोबतच त्यांनी आपले वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या तामिळनाडूत झालेल्या हत्येचाही त्यांनी उल्लेख करत तो क्षण त्यांच्यासाठी किती दुःखद होता हे सांगितले.
लोकांना संबोधित करताना प्रियंका गांधी यांनी, 32 वर्षांपूर्वी जेव्हा मी तामिळनाडूत आले तेव्हा काही तासांपूर्वी माझ्या वडिलांची हत्या झाली होती. माझ्या वडिलांच्या शरीराचे अवयव गोळा करत होते तेव्हा मला कोणतीही भीती वाटत नव्हती. त्यावेळी मी पूर्णपणे एकती होते.
पुढे बोलताना काँग्रेसच्या सरचिटणीसांनी महिलांना संबोधित करताना, “तुम्ही सर्व माझ्या माता आहात. तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. त्यासोबतच पुढे बोलताना त्यांनी, देशातील महिलांना कधी ना कधी वंचितांचा सामना करावा लागला आहे. वंचित आणि दु:ख सहन करण्याच्या आमच्या प्रचंड क्षमतेच्या आधारे आम्ही आमच्या दृढनिश्चयाने आणि इच्छाशक्तीने सर्व काही साध्य केले आहे.
त्यासोबतच त्यांनी, आम्ही यापेक्षा बरेच काही आहोत. आपल्या खंडाला विकासाच्या मार्गावर नेणारी कार्यशक्ती आपण आहोत. आपल्या डोळ्यात आणि हृदयात चांगल्या भविष्याचे स्वप्न जपणाऱ्या लाखो आणि करोडो तरुणीही आम्ही आहोत.असेही त्यांनी यावेळी महिलांना उद्देशून म्हटले.