इस्लामपूर ( प्रतिनिधी) :-” कारागृह कॅन्टीनमध्ये पोषण आहार ” या अंतर्गत कैद्यांना चिकन पासुन पनीर , श्रीखंड आदि 85 प्रकारचे पदार्थ विकत घेता येणार आहेत ” राज्याचे कारागृह महानिरीक्षक सुनिल रामानंद यांनी अशा स्वरूपाचा आदेश राज्यातील सर्व कारागृहांना दिला आहे . त्याप्रमाणेच कारागृह कैद्यांच्या पत्नीला पति मिलनाची सवलत द्यावी ,असे मत महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केली आहे.
माजी जेष्ठ मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी म्हटले आहे की, ” कारागृह कॅन्टीनमध्ये पोषण आहार “या मथळ्याखाली आलेली बातमी वाचनात आली. त्या वृत्तात म्हटले आहे .” कैद्यांना चिकन पासुन पनीर , श्रीखंड आदि 85 प्रकारचे पदार्थ विकत घेता येणार.” राज्याचे कारागृह महानिरीक्षक सुनिल रामानंद यांनी अशा स्वरूपाचा आदेश राज्यातील सर्व कारागृहांना दिला आहे . यामुळे कारागृहांतील कैद्यांना कारागृहाच्या नियमानुसार नियमित भोजन व नाष्टा मोफत दिला जातो . परंतु त्यांना अन्य पदार्थ कारागृहात मिळत नाहीत ते कारागृह कॅन्टीन मधुन विकत घेता येतील.
रामानंदांच्या या निर्णया संदर्भात बाहेरच्या कोणी स्वागत केले किंवा नाके मुरडली याला महत्व असणार नाही . परंतु कारागृहातील अपवाद वगळता सर्व कैदी या निर्णयाचे स्वागत करतील व रामानंदाना धन्यवाद देतील. या निमित्ताने कारागृह कैद्यांना सोई सुविधा देण्याचा विषय समोर आलाच आहे. तर त्यात भर म्हणून आम्हास नम्रपणे रामानंदांना विनंती करावीशी वाटते, ती अशी आपली भारतीयांची समाज व्यवस्था ही बहुतांशी पुरूष प्रधान आहे . त्यातील काही पुरूष गुन्हेगार प्रवृत्तीचे असतात तसेच काही पुरूषांना त्याच्या झालेल्या नाईलाजामुळे गुन्हा करावा लागतो . असा गुन्हा ज्याच्या हातून झाला आहे . त्यामध्ये त्याच्या पत्निचा काहीही संबंध नसतो मात्र गुन्हा केलेल्या पतीला गुन्हा केल्यामुळे शिक्षा भोगावी लागत असली तरी पती शिवाय घर प्रपंच चालवणे, मुलांचे पालन पोषण करणे अशा विविध जबाबदाऱ्या तिच्या समोर आवासुन उभ्या असतात त्याला एकटीने तोंड देवून कुटुंबाची प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी कष्ट करावे लागते.
त्या सर्वांपेक्षा तिला क्लेश कारक विषय असतो तो पती सुखापासुन पारखे झाल्याचा पती गुन्हा करून शिक्षा भोगत असतो आणि त्याच्या पत्निला तिचा कोणताही दोष नसताना तिने गुन्हा केलेला नसताना सर्व जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात . त्या पेलण्यातही आनंद निर्माण करणारी बाब म्हणजे घरात मिळणारा पती मिलनाचा मनसोक्त आनंद आपण काहीही गुन्हा केला नसताना तिला या सुखापासुन वंच्छित व्हावे लागुन मनःक्लेश सहन करत जीवन जगावे लागते . हि तिच्यावर अन्यायाने लादलेली शिक्षाच नव्हे का ?
रामानंदसाहेबांनी तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या जीभेचे चोचले पुरवण्याच्या हेतुने निर्णय घेतला असेल. अशा कैद्यांच्या पत्नीच्या ही भाव भावनांचा विचार मोठ्या मनाने व उदार अंतःकरणाने करावा महिलांना आठ-पंधरा दिवसाने का होईना कधी पती सुखाचा लाभ घेता येईल असे धोरण जाहिर करून कारागृह परिसरात अशा सुविधा निर्माण कराव्यात अशी आमची त्यांना या प्रतिक्रियेद्वारे सुचना आहे .
यामुळे एका दगडात दोन पक्षी मारल्यासारखे होईल . एक तर मिया बेबी राजी राहिल्यामुळे रामानंदजींना धन्यवाद देतील व दुसरी महत्वाची बाब म्हणजे त्याच व्यवस्थेवरचा खुप तान कमी होईल आणि या सुविधे करिता कारागृह परिसरात अलिशान खोल्या या उपक्रमासाठी निर्माण केल्या तर कारागृह विभागाला उत्पन्नाचे मोठे साधन निर्माण होईल व कैदी तसेच त्यांचे नातेवाईक रामानंदना धन्यवाद देतील अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केली आहे.