टाकवे बुद्रुक – संपूर्ण आंदर मावळातील नागरिकांनी मागणी केलेल्या इंद्रायणी पुलाला राज्यमंत्री होताच अवघ्या पाच दिवसात मंजुरी दिली असून इंद्रायणी पुलाच्या कामांचे भूमिपूजन विधानसभा निवडणुकीपुर्वी करणार असल्याची माहिती कामगार पुनर्वसन राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी दिली. ते आंदर मावळ दौऱ्यावर असताना त्यांनी ही माहिती दिली.
राज्यमंत्री झाल्यानंतरचा बाळा भेगडे यांचा आंदर मावळ पहिला दौरा असल्याने संपूर्ण आंदर मावळात राज्यमंत्र्याचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. टाकवे येथून दौऱ्याची सुरुवात करताना प्रथम टाकवे बुद्रुक येथे पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले. यादरम्यान टाकवे ग्रामपंचायत, असवले स्कूल, टाकवे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने नामदार बाळा भेगडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मावळ तालुका प्रभारी भास्कराव म्हाळस्कर, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, माजी उपसभापती शांताराम कदम, सभापती सुवर्णा कुभांर, उपसभापती जिजाबाई पोटफोडे, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, सरचिटणीस यदुनाथ चोरघे, महिला अध्यक्षा नंदाताई सातकर, टाकवे वडेश्वर गट अध्यक्ष रोहिदास असवले, आंदर मावळ भाजप अध्यक्ष गणेश कल्हाटकर, टाकवे- वडेश्वर युवा मोर्चा गट अध्यक्ष काळूराम घोजगे, ज्येष्ठ नेते राजू शिदे, शिवसेना संघटक सोमनाथ कोंडे, तुकाराम कोद्रे, राजाराम असवले, दत्ता असवले, सदाशिव जांभुळकर, काशिनाथ जांभुळकर, मुनावर अत्तार, काळुराम असवले, भगवान लोढे, सपंत शिदे, यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.