इंदौर – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख ‘शेतकऱ्यांचे देव’ असा करत विवादित कृषी विधेयकांना पाठिंबा दर्शवला आहे. मोदी सरकारच्या या विधेयकांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल असा दावा देखील चौहान यांनी यावेळी बोलताना केला.
काल (बुधवार) रात्री पत्रकारांशी बोलताना चौहान यांनी कृषी विधेयकाचे जोरदार समर्थन केले. यावेळी त्यांनी सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध करणाऱ्या विरोधीपक्षांना ‘शेतकरद्रोही’ अशी उपमा दिली. विरोधकांची आगपाखड दलालांचे हित अबाधित राखण्यासाठी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्टीतून निर्णय घेत आहेत. ते शेतकऱ्यांसाठी देव आहेत. मंजूर करण्यात आलेली शेती विषयक तिन्ही विधेयके शेतकऱ्यांसाठी वरदान आहेत. यामुळे त्यांचे उत्पन्न दुप्पट होईल.” असा दावा चौहान यांनी केला.
चौहान यांनी विरोधकांच्या आंदोलनामागील उद्देशावर प्रश्न उपस्थित करताना, “जर कोणताही निर्यातदार थेट शेतकऱ्यांकडून चांगल्या दराने गहू आणि तांदूळ खरेदी करेल तर दलालांची आवश्यकता यूरेलणारच नाही. विरोधीपक्षांकडून दलालांची पाठराखण का केली जात आहे?” असा जाब विचारला.