नवी दिल्ली : महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी शिफारस करणारे पत्र आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिणार असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांनी आज पत्रकारांना दिली.
महाराष्ट्रात भाजपच्या नेत्यांना टार्गेट करत कायदेशीर कारवाई केली जात असल्याचा आरोप करत केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले म्हणाले की, राज्यात लवकरात लवकर राष्ट्रपती लागवट लागू केली जावी. याविषयी ते लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिणार आहेत आणि त्यांची भेट घेणार आहेत.
नुकत्याच झालेल्या बदलीप्रकरणी महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबई पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला आहे.
दुसरीकडे, मुंबई बॅंक घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. या दोन्ही मुद्द्यांवर भाजप सतत हल्लाबोल आहे. मंत्री रामदास आठवलेही याच विषयावर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते.