Prakash Ambedkar on Jarange। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. त्यामुळे त्यांची तब्बेत खालावत चाललीय. दरम्यान त्यांच्या तब्बेतीविषयी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विधान केले आहे.
त्यांच्या सगळ्या गोष्टी तपासाव्यात Prakash Ambedkar on Jarange।
प्रकाश आंबेकर हे अकोला दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्याविषयी प्रतिक्रिया दिली. “मनोज जरांगेचे आंदोलन ज्या पद्धतीने चालू आहे त्या आंदोलनामुळे बरेचजण धास्तावलेत. निजामी मराठ्यांच्या राजकारण विरोधात जरांगे यांनी अत्यंत आक्रमक पाऊल उचललं आहे हे स्पष्ट झालंय. त्यांमुळे त्यांना जी औषधं दिली जात आहेत, जी सलाईन, जेवण आणि ज्युस (फळांचा रस) दिला जातोय, या सगळ्या गोष्टी तपासायला हव्यात. त्यानंतरच त्यांनी त्याचं सेवन करावं. शासन ही व्यवस्था करेल अशी अपेक्षा मी बाळगतोय.”
डॉक्टरांना सक्त ताकीद द्यावी Prakash Ambedkar on Jarange।
पुढे आंबेडकर यांनी,”मनोज जरांगे ज्या पद्धतीने राजकारण बदलू पाहत आहेत. त्यांचं आंदोलन असंच चालू राहिलं तर अनेक जणांचे खेळ संपणार आहेत. लोकांच्या संपत्तीवर टाच येऊ शकते. राजकारणात काहीही होऊ शकतं. मनोज जरांगे यांना असलेला धोका लक्षात घेता मी शासनाला विनंती करतो की तुम्ही मनोज जरांगे यांच्यासाठी जे डॉक्टर्स नेमले आहेत, त्या डॉक्टरांना सक्त ताकीद दिली पाहिजे की तपासल्याशिवाय, बघितल्याशिवाय जरांगेंच्या गोष्टींमध्ये कोणालाही हस्तक्षेप करू देऊ नका.”
मी जरांगेंना सल्ला देईन की…
तसेच आगामी काळात राजकारणाात भयंकर मोठी उलथापालथ होणार आहे. तरीही आपल्याला सरकारी डॉक्टरांवर विश्वास ठेवावा लागेल. मी जरांगेंना सल्ला देईन की ते जी औषधं, साईन, ज्युस किंवा जेवण घेत आहेत त्या गोष्टी जवळच्या व्यक्तीला तपासायला लावा. जेवण हे ओळखीच्या माणसाने दिलेलं असायला हवं. तसेच ज्या दुकानातून साहित्य आणलं जातंय तो दुकानदार ओळखीचा असायला हवा. जेवण तुमच्या घरातून आलं असेल तर उत्तम. मनोज जरांगे यांनी निजामी मराठ्यांच्या राजकारणाला आव्हान दिलं आहे. त्यामुळे त्यांनी आता सावध असलं पाहिजे.