Prakash Ambedkar । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीचा तिढा काही केल्या सुटत नाही. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान आज त्यांनी खरगे यांना पत्र का लिहिले याचे कारण दिलंय.
आज प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील मविआचा तिढा का सुटत नाही? याविषयी माहिती दिली. “महाविकास आघाडीच जागा वाटप होत नाहीय. याच कारण वंचित बहुजन आघाडी नाहीय. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत 10 जागांवरुन मतभेद आहेत. या 10 जागा काँग्रेस मागतय, उद्धव ठाकरे यांनाही त्या जागा हव्या आहेत. चर्चा त्यांच्यामध्ये झाली. पण ते सीट सोडायला तयार नाहीत, अशी परिस्थिती आहे” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. “दुसरा भाग असा आहे की, पाच जागा अशा आहेत की, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शेअरींगमध्ये होत नाहीय. एकही जण दावा सोडायला तयार नाहीय. म्हणून त्यांचा समझोता होत नाहीय” असं आंबेडकर म्हणाले.
“संजय राऊत हे मीडियाला खोट सांगतात Prakash Ambedkar ।
“संजय राऊत हे मीडियाला खोट सांगतात. भांडणं मिटलेली नसताना एकत्र जाणार की, मैत्रीपूर्ण लढणार? याचा निकाल लावलेला नाही” असं आंबेडकर म्हणाले. “आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आधी तुमचं मिटवा. महाविकास आघाडीच चर्चेच घोंगड भिजत असलं, तरी काँग्रेस आणि वंचितमधील समझोता पुढे घेऊन जाऊ, यासाठी चैनीथला यांच्याशी चर्चा केली. पण त्यांच्याकडून दुजोरा मिळाला नाही, म्हणून काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांना पत्र लिहिलं. समझोता पुढे नेण्यासाठी हे पत्र होतं. पण अजून उत्तर आल नाही ” असं ते म्हणाले.
“मोदींची सत्ता घालवणं की पक्ष वाढवणं? Prakash Ambedkar ।
“मोदींची सत्ता घालवणं की पक्ष वाढवणं? काँग्रेसची प्राथमिकता काय?” असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारला. प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत राहतील का? हा मुद्दादेखील त्यांनी मांडला. “नवनीत राणा यांनी जेलमध्ये जाण्याची मानसिक तयारी केली पाहिजे. त्यांनी फ्रॉड केला आहे. संजय राऊत म्हणतात समझोता झाला आहे, तर त्यांनी 10 जागांसंदर्भात बोलावे. आम्ही मविआसोबत बसलो आहोत, संजय राऊत यांच्या सोबत नाही” असे ते म्हणाले.
हेही वाचा
महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटेना? प्रकाश आंबेडकरांनी थेट मल्लिकार्जुन खर्गेंना लिहिले पत्र