नवी दिल्ली – देशातील गरिबीविरुद्धच्या लढाईबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जागतिक बँकेच्या धोरण अहवालानुसार, आठ वर्षांत भारतात गरिबीच्या प्रमाणात 12.3 टक्क्यांनी घट झाली आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात गरिबी झपाट्याने कमी झाली आहे. जागतिक बँकेच्या पॉलिसी रिसर्चच्या वर्किंग पेपरमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
त्यात म्हटले आहे की भारताने अत्यंत गरिबी जवळजवळ संपवली आहे. यासह, देशातील उपभोग असमानता 40 वर्षांतील सर्वात कमी पातळीवर आहे. 2011 मध्ये गरिबीचा दर 22.5 टक्के होता, जो 2019 मध्ये 10.2 टक्क्यांवर पोहोचला. अहवालानुसार, भारताच्या ग्रामीण भागात गरिबीत मोठी घट नोंदवली गेली आहे.