मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाला येत्या शनिवारपासून प्रारंभ होत आहे. मात्र, त्यापूर्वीच या स्पर्धेतील सामने होणार असलेल्या सर्व मैदानांची, खेळाडूंच्या हॉटेल्सची तसेच त्यांच्या जाण्या-येण्याच्या मार्गांची रेकी करण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. त्यामुळे या स्पर्धेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट निर्माण झाले आहे. मात्र, मुंबई पोलीसांनी हे वृत्त नाकारले आहे.
अर्थात स्पर्धेची तयारी करत असलेल्या खेळाडूंना कडेकोट सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितल्यामुळे या वृत्तात तथ्य असल्याचेही संकेत मिळत आहेत.