Gadchiroli – एकाच कुटुंबातील पाच जणांची खाण्यात विष घालून हत्या करण्यात (family members killed) आल्याची धक्कादायक व मन हादरवून टाकणारी घटना गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील महागाव येथे घडली आहे.
वीस दिवसांत एकामागून एक जण लोकांचा मृत्यू होऊ लागल्याने संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या प्रकरणात तपास करत हत्याकांड घडवून आणणाऱ्या सुनेसह तिच्यासोबत असलेल्या अन्य एका महिलेस अटक केली आहे.
तर दोघींनी देखील सर्वांची हत्या घडवून आणल्याची कबुली दिली. महागाव येथील लोकांना जादूटोण्याची भीती वाटू लागली, एकाच कुटुंबातील एकूण पाच जणांचा एकामागून एक मृत्यू झाला, हा मृत्यू संशयास्पद होता.
त्यामुळे पोलिसांचा ताण वाढला, पोलिसांनी तपास सुरू केला, त्यानंतर तपासात धक्कादायक बाब समोर आली. सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली.
घरात सातत्याने होत असलेला जमिनीवरून वाद तसेच सासरकडील लोकांकडून मिळत असलेल्या टोमण्यांमुळे सुनेने अन्य एका महिलेच्या मदतीने घरातील सर्वांना विष देऊन संपविल्याची माहिती आता मिळत आहे.
तिघांवर उपचार सुरू
गेल्या काही दिवसांत अहेरी तालुक्यातील महागाव येथील शंकर पीरू कुंभारे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 4 जणांचा अचानक आजारी पडून मृत्यू झाला. अवघ्या वीस दिवसांत घरातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे व संशयाचे वातावरण निर्माण झाले होते.
खाण्यात विष देऊन सुनेसह अन्य एका महिलेने हा प्रकार घडवून आणल्याची कबुली दिली आहे. दरम्यान या प्रकरणी अद्यापही तिघांवर उपचार चालू असल्याचीही माहिती मिळत आहे.