नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतातील जनतेला संबोधित केले. आज ते कोणत्या विषयावर बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी पंतप्रधानांनी कोरोना संसर्गाबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले.
सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. भारतात कोरोनाच्या अनेक लसिंवर काम सुरू आहे.
लस विकसित करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत काळजी घ्यावी असे मोदी यांनी सांगितले. तसेच पंतप्रधानांनी ट्विट करत ‘जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं,’ असे म्हटले आहे.
याद रखिए, जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 20, 2020