नवी दिल्ली – नवा कृषी कायदा रद्द करण्यासाठी मोदी सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज नवे आवाहन केले आहे. 27 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी रेडिओवर ‘मन की बात’ करतील, त्यावेळेला सर्वांनी आपल्या घरात थाळ्या वाजवाव्यात, असे अपील शेतकऱ्यांनी केले आहे.
आज आंदोलक शेतकऱ्यांनी ‘शहीद दिवस’ पाळला. आंदोलनस्थळी आणि संपूर्ण पंजाबमध्ये शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
दरम्यान, करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांना जागृत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थाळी नांद करण्याचे देशवासियांना आवाहन केले होते. त्यावेळी संपूर्ण देशभर या थाळी नांदला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.
आता कृषी कायद्याविरोधात तब्बल 25 दिवसांपासून आंदोल करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारला जागे करण्यासाठी पुन्हा एकदा 27 डिसेंबरला थाळी नांद करण्याचे आवाहन आंदोलक शेतकऱ्यांनी केले आहे. ज्यामुळे सरकार जागे होऊन कृषी कायद्याविरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करेल.