ही कथा पोलंडच्या एका खेड्याच्या रस्त्यावर घडते. कथेच्या सुरुवातीलाच एक अपघात होतो त्यात एका माणसाची पत्नी व मुले यांचा मृत्यू होतो. त्यानंतर घडणाऱ्या गोष्टींभोवती हा चित्रपट फिरतो.
चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगत अभिनेता मिचॅट पावलिक म्हणाले, “पोलंडमध्ये काही वर्षांपूर्वी अशी अपघाताची घटना घडली होती.त्यावरून दिग्दर्शक बार्तोज कृहलिक यांना या चित्रपटाची कथा सुचली. एक श्रीमंत माणूस, पोलीस आणि एक दारूच्या नशेत असणारा माणूस या तिघांची चित्रपटात मुख्य भूमिका असली, तरी इतर भूमिकाही तितक्याच महत्वाच्या आहेत.”
“ही कथा खेड्यात, शहरात, जगात कोठेही घडू शकते, अशी आहे. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद उत्तम असून विविध स्तरांमधील लोक चित्रपट भावल्याचे सांगत आहेत. येथे पिफमध्येही चित्रपटाचे विद्यार्थी भेटून अभिप्राय देत आहेत. सर्वांना कुठल्या न कुठल्या प्रकारे जवळची वाटेल अशी ही कथा आहे.”, असेही मिचॅट यांनी सांगितले.