गेले अनेक दिवस गुंतवणूकदार गोंधळाच्या मनस्थितीत आहेत…नेमकी बाजाराची दिशा काय…अशा सततच्या चढ – उतारात नेमके पैसे कुठे गुंतवावे, आता गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे का? 41000 च्या बाजारात कुठे गुंतवणूक संधी आहेत याचा आज आपण परामर्श घेऊयात.
सध्याच्या अर्थव्यवस्थेची व बाजाराची दिशा पहाता प्रमुख 250 कंपन्याच्या होणाऱ्या उलाढालीत होणारा नफा भविष्यात मोठ्याप्रमाणात दिसत असल्याने या ठिकाणी उपलब्ध संधी गुंतवणूकदारांसाठी आकर्षित करत आहेत. मोठ्या आकाराच्या प्रमुख 100 कंपन्या (लार्ज कॅप) व त्यानंतरच्या येणाऱ्या 150 कंपन्या (मिड कॅप)यांचा एकूण बाजारपेठेतील हिस्सा 87% आहे.देशातील अर्थव्यवस्थेतेतील बहुतांशी वाढ याच प्रमुख कंपन्यांच्या व्यवसायातून येत आहे.
या कंपन्याचे बाजारातील आकारमान ( मार्केटकॅप) 8858 कोटींपासून 8,12,262 कोटींमध्ये आहे. गुंतवणूकदारांनी किमान तीनवर्षांपेक्षा जादाच्या कालावधीसाठी अशा योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस नफा कमवण्याची संधी निर्माण झाली आहे. म्युच्युअल फंडाच्या अशा योजना बाजारात उपलब्ध आहेत. अशा योजनांमध्ये 35% गुंतवणूक लार्ज कंपन्यांमध्ये, 35% गुंतवणूक मध्यम कंपन्यांमध्ये व 30 आकर्षक संधी असणाऱ्या कंपन्यामध्ये गुंतवणूक केली जाते.
येत्या 6 डिसेंबरपासून भारतीय गुंतवणूकदारांसाठी महेंद्र म्युच्युअल फंडाच्या टॉप 250 निवेश योजना व युनियन लार्ज आणि मिड कॅप फंड रू.10.00 दराने गुंतवणूकीसाठी उपलब्ध होणार आहे. दोन्ही योजना ओपन एंडेड आहेत, याचा अर्थ गुंतवणूकदार खरेदी व विक्री गरजेनुसार करू शकतील.
पुढील योजनांमध्ये गुंतवणूकदारांसाठी सर्व चढ – उतारानंतरही उत्तम परतावा मिळाला आहे. येणारे 10 वर्ष अर्थव्यवस्थेतेतील उत्तम काळ अपेक्षीत असल्याने याप्रकारच्या योजनांमधून सातत्याने उत्तम परतावा गुंतवणूकदारांसाठी मिळणार आहे.
सध्याची अर्थव्यवस्थेची स्थिती 2.7 ट्रिलीयन डॉलरवरून 2025 पर्यंत 5.2 ट्रिलीयनपर्यंत वाढण्याचा अंदाज नोंदवला गेला आहे. यानुसार भारतीय अर्थव्यवस्थेतेतील वृध्दी जवळपास दुप्पट होणार आहे. याचा सर्वात जास्त फायदा या टॉप 250 कंपन्यातील गुंतवणूकदारांना होणार आहे.
केंद्र सरकार करत असलेल्या कामगार कायद्यातील सुधारणा, टेक्नॉलोजी आणि इनोवेशन, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, यासाठी केले जात असलेले प्रयत्न, आर्थिक सहभागात्वाच्या योजना, सर्वाना घर देण्याची महत्त्वाकांक्षी योजना, आणि वाढता पर्यटन उद्योग, या सर्व गोष्टी नव्या संधी उपलब्ध करणार आहेत. देशातील अर्थव्यवस्थेतेतील वाढ दुप्पट करणार आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात आकर्षक मूल्य टॉप 250 कंपन्यांनमध्ये उपलब्ध आहे. या संधीचा फायदा गुंतवणूकदारांसाठी निर्माण झाला आहे.
– संदीप भूशेट्टी
(गुंतवणूक तज्ज्ञ व आर्थिक सल्लागार)