मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आपल्या स्पष्ट आणि सडेतोड भूमिकेसाठी सर्वांनाच परिचीत आहे. तसेच त्या आपल्या ट्विटरवरून देखील राजकीय टीका करताना दिसतात. मात्र सध्या त्या, त्यांनी मांडलेल्या एका लॉजिकमुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या या लॉजिकला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी
अमृता फडणवीस यांनी मुंबईत होणाऱ्या घटस्फोटासंदर्भात एक लॉजिक मांडलं आहे. मुंबईत प्रचंड वाहतुक कोंडी असून मुंबईतील वाहतुक कोंडीमुळे घटस्फोटाचं प्रमाण वाढल्याचा दावा अमृता फडणवीस यांनी केला आहे.
आज मुंबईत ट्रॅफिकमुळे किती टक्के घटस्फोट होतात, हे तुम्हाला माहित आहे का असा प्रश्न करत अमृता फडणवीस यांनी घटस्फोटाचं प्रमाणही सांगितलं. वाहतुक कोंडीमुळे मुंबईत 3 टक्के घटस्फोट होतात, कारण आपण आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही, आणि हे बोलणार नाही तर कसं होणार, असंही त्या म्हणाल्या.
अमृता फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना किशोरी पेडणेकर यांनी उत्तर देत म्हटलं की, मुंबईतील रस्ते गुळगुळीत आहेत, असा दावा आम्ही कधीही केलेला नाही. पण माहिती मिळताच रस्त्यांवरील खड्डे बजुवले जातात, वाहतूक कोंडीमुळे लोकांचे घटस्फोट होतात, हे विधान चुकीचं असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.