पाकीस्तानी धार्जिणे मतांसाठी असे वक्तव्य करतात; स्नेहलता कोल्हेंचा पठाणला दणका
कोपरगाव: वारिस पठाण यांचे वक्तव्य म्हणजे या देशात राहून देशातील नागरिकांना धर्माच्या नावाखाली विरोध करतात यावरून ते पाकिस्तान समर्थकांची भूमिका बजावतात अशी शंका येत आहे. या देशातील नागरिकांना आव्हानात्मक बोलणे योग्य नसून सर्व जाती-धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने एकत्र राहत असताना एखाद्या राजकीय पक्षाला किंवा ठराविक समूहाला टार्गेटकरुन जातीय तेढ निर्माण करणे योग्य नाही. वारीस पठाण यांच्या देश विघातक वक्तव्याचा भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी निषेध व्यक्त केला आहे.
या देशांमध्ये जो कायदा तयार होतो तो सर्व धर्मासाठी, सर्व नागरिकांसाठी लागू असतो. संपूर्ण देशाची एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी असतो, असे असताना एआयएमआयएम’चे नेते माजी आमदार वारिस पठाण यांनी एका कार्यक्रमामध्ये शंभर कोटी हिंदूना आमचे 15 कोटी मुस्लीम भारी पडतील, असे वादग्रस्त वक्तव्य केले. देशात दुफळी निर्माण होईल असे विधान पठाण यांनी केले आहे.
कोल्हे म्हणाल्या, मुस्लिम बांधव या देशाचे नागरिक आहेत त्यांना कोणताही धक्का न लागता या देशाचे भूमिपुत्र म्हणून सतत सन्मानाची वागणुन दिली जाते. पण काही पाकीस्तानी धार्जिणे वृत्तीचे मुस्लीम नेते केवळ मताच्या राजकारणासाठी असे ढोंगी वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करतात. सबका साथ सबका विकास यातून सर्वांना सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत आहे, असे असताना पठाण यांनी 15 कोटी मुस्लिमांच्या नावाने राजकारण करुन महीलांमध्ये संघर्ष उभा करीत आहेत. त्यांच्या वाघीनी आहेत मात्र आम्ही जिजाऊ व सावित्रीच्या लेकी आहोत. एकतेची व अखंडतेची शिकवन व संस्कार आम्हा स्त्रियांना आहेत. तेव्हा पठाण यांनी या भारत मातेशी धर्माच्या नावाखाली गद्दारी करु नये. आम्ही एकत्र आलो तर शंभर कोटींना भारी पडू असे आव्हानात्मक विधान पठाण यांनी कोणाला करीत आहेत. हे हिंदूस्थानात राहून पाकिस्तानला समर्थन करतात काय? असा प्रश्न कोल्हे यांनी केला आहे.
आपण सर्वजण या हिंदुस्थान देशाचे नागरिक आहोत सर्व जातीधर्माचे नागरिक एकत्र राहत असताना मतासाठी धार्मिक ढोंग निर्माण करून दिशाभूल केली जात आहे अशा ढोंगी वक्तव्यापासून आपण जागे होण्याची गरज आहे. व भडकावू वक्तव्य करणाऱ्या पासून सावध राहून एकसंघ हिंदुस्तान अबाधीत ठेवला पाहीजे, असे कोल्हे म्हणाल्या.