मुंबई – शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला. यावेळी मुख्यमंत्री आणि शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्यावर भाष्य केलं.
भाषण दरम्यान ते म्हणाले,’तुम्ही वचन मोडलं. आणि मी मुख्यमंत्रिपद स्विकारलं आणि कारण माझ्या पित्याला मी वचन दिलं होतं. मी तुमच्या शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवले, असं वचन आणि जबाबदारी घेतली. कदाचित जर दिलेले वचन भाजपने पाळलं असतं तर कदाचित मी राजकीय जीवनातून बाजूला सुद्धा झालो असतो. मात्र अजुनही मी शिवसैनिकाला राज्याचा मुख्यमंत्री बनवणारच, अस म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला होता.
त्यांचा या टीकेवर आता देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलतांना सडेतोड उत्तर दिल आहे. ‘दोन वर्ष झाली किती वेळा म्हणणार मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हंत, आता मुखवटा काढा आणि तुमची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री बनण्याची होती हे मान्य करा.’
ते पुढे म्हणाले,’काल मुख्यमंत्री जे बोलले त्यावरून फ्रस्ट्रेशन दिसून येतं. जनतेनं भाजपला नाकारलं नाही. काँग्रेस शिवसेनेला नाकारलं आहे आणि शिवसेनेला पासिंग मार्क्स दिले. जनतेसोबत बेईमानी करत हे सरकार स्थापन केलं आहे.’