Parliament Last Day। आज १७ व्या लोकसभेच्या कामकाजाचा शेवटचा दिवस आहे. आजच्या शेवटच्या सत्राचा समारोप ऐतिहासिक राममंदिराच्या निर्माण, रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेच्या चर्चेने होणार. राज्यसभेतही याच मुद्द्यांवर चर्चा घेण्यात येणारंय.
सत्ताधारी भाजपने आपल्या सर्व खासदारांना व्हीप जारी करत संसदेच्या दोन्ही सभागृहात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सांदेत धन्यवाद प्रस्ताव सादर करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतीय.
राज्यसभेचे अध्यक्ष धनखर म्हणाले की, 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सभेच्या दिवशी शून्य तास किंवा प्रश्नोत्तराचा तासही नसेल. या महत्त्वाच्या मुद्द्यांवर शनिवारी दोन्ही सभागृहात चर्चा होणार आहे.
हेही वाचा
मोदी सरकारच्या अजेंड्यावर काय ? भाजपने सर्व खासदारांना बजावला व्हिप
‘या’ मुद्द्यावर होणार चर्चा Parliament Last Day।
सरकार आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात राम मंदिरावर चर्चा करणार आहे. अमृतकाळात विकसित भारतासाठी प्रतिज्ञा घेण्यात येणारंय. रामराज्याप्रमाणे सुशासन स्थापन कारण्यावरदेखील या सत्रात चर्चा होईल. आम्ही कोणत्या प्रकारचा देश बनवू इच्छित आहोत आणि आपल्याजवळ कसे नेतृत्व असले पाहिजे यावर देखील चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जातीय.
…तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही Parliament Last Day।
दरम्यान, आजच्या कामकाजही सुरुवात बागपतचे खासदार सत्यपाल सिंह, शिंदे गटाचे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे करणार आहेत. सत्यपाल सिंह यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम राज्य स्थापन करण्याच्या दृष्टीने काम करतायत, जोपर्यंत देशात राम राज्य स्थापित होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असे म्हटले होते.
यंदाचे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू झाले होते. ते ११ दिवस चालले. हे सत्र अनेक अर्थांनी खास ठरले. या अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला, मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प होता.
हेही वाचा
Finance Minister Nirmala Sitharaman “सोनिया गांधी सुपर पीएम होत्या”
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १० फेब्रुवारीपर्यंत चालणार