Finance Minister Nirmala Sitharaman । अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि यूपीए सरकार विरोध चौफेर टीका केली. सीतारमण म्हणाल्या यूपीए सरकार दिशाहीन आणि नेतृत्वहीन होती. त्यांनी सोनिया गांधींवर खोचक टीका केली. सोनिया गांधी सुपर पंतप्रधान होत्या असेही त्या म्हणाल्या.
सोनिया गांधींवर सडकून टीका
यूपीएच्या गैरव्यवस्थापनाचे केंद्र असून, ते घोटाळ्याचे १० वर्ष होते, सोनिया गांधी राष्ट्रीय सल्लागार परिषदे अध्यक्षाच्या रूपात सुपर पंतप्रधान होत्या पंतप्रधानांचे सल्लागार मंडळ म्हणून स्थापन केलेल्या NAC चे अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांना घटनाबाह्य अधिकार मिळाल्याने प्रशासनावर दबाव होता. सरकारने 710 फाईल्स “मान्यतेसाठी” NAC कडे पाठवल्याचा दावा निर्मला सीतारमण यांनी केला.
यावेळी बोलतांना निर्मला सीतारमण ( Nirmala Sitharaman ) यांनी लोकसभेत श्वेतपत्रिकेवरील चर्चा करतांना २००४ ते २०१४ पर्यंत सत्तेत असलेल्या युपीए आणि भाजपच्या नेतृत्वात असलेल्या एनडीएच्या काळातील अर्थव्यवस्थेची तुलना केली आहे.
हेही वाचा :
पीएम नरेंद्र मोदी 24 तासात फक्त साडेतीन तास झोपतात; खासदारांसोबत जेवताना केला खुलासा
निर्मला सीतारमण – राहुल गांधी गर्विष्ठ
निर्मला सीतारमण यांनी २०१३ सालच्या एका घटनेचा संदर्भ देत काँग्रेसच्या माजी राष्ट्र्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या,’ मनमोहन सिंह सरकार काळात राहुल गांधी यांनी अध्यादेश फाडला होता. राहुल गांधी गर्विष्ठ आहे, त्यांनी अध्यादेश फाडत त्याच्याच सरकारमधील पंतप्रधानांचा अपमान केला.
राहुल गांधी यांनी या अध्यादेशाला “संपूर्ण चुकिचे” म्हणून संबोधले होते. पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले होते की, ‘मला वैयक्तिकरित्या वाटते की सरकार अध्यादेशावर जे करत आहे ते चुकीचे आहे. हा एक राजकीय निर्णय होता, प्रत्येक पक्ष हे करतो आणि हे थांबवण्याची वेळ आली आहे, जर आम्हाला भ्रष्टाचार थांबवायचा आहे, आम्ही या तडजोडी करू शकत नाही.’ असं म्हणत सितारमण यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.
हेही वाचा :
राहुल गांधींचं वादग्रस्त विधान म्हणाले,’PM मोदी OBC म्हणून जन्माला आलेले नाहीत, ते तर…”